
Interesting Facts About How Kokan Got It’s Name: भारताला एकूण तीन बाजूंनी समुद्र किनारा लाभलेला आहे. भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर, दक्षिणेला हिंदी महासागर, पश्चिमेला अरबी समुद्र आहे. भारताला एकूण 7 हजार 516.6 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. सर्व्हे ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, भारताच्या एकूण समुद्रकिनाऱ्यापैकी 5 हजार 422.6 किलोमीटर किनारपट्टी मुख्य भूभागाला लागून आहे, तर 2 हजार 94 किलोमीटर किनारपट्टी बेट प्रदेशावर आहे. त्यातही महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्राला एकूण 720 किमी लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभला आहे. पालघर, ठाणे, मुंबई शहर आणि उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशी राज्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील सहा जिल्ह्यांची नावं आहेत. महाराष्ट्राला लाभलेल्या किनारपट्टी भागाला कोकण पट्टा असं म्हणतात.
जगभरात ओळखलं जातं कोकण
अर्थात कोकण ठाऊक नसलेला मराठी माणूस सापडलं कठीण! निसर्गसौंदर्याने नटलेलं कोकण केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतं. ‘यावा कोकण आपलोच असा’ असं म्हणत कोकणी माणूसही मोठ्या प्रमाने पर्यटकांचा पाहुणचार करतो. कोणकला आज तेथील निसर्ग सौंदर्याबरोबरच हापूस आंबा, खाद्य संस्कृती, मंदिरं आणि ऐतिहासिक वारश्यासाठी ओळखलं जातं. तळ कोकणामधून उदर्निवाहासाठी मुंबई आणि उपनगरांमध्ये स्थायिक होऊन काम करणाऱ्या कोकणवासीयांसाठी तर त्यांचं गाव म्हणजे जीव की प्राण!
‘कोकण’ हे नाव कसं पडलं?
शिमगा असो, गणपती असो कोकणी माणूस वेळेत वेळ काढून आपल्या गावी जातो. कोकणी माणसाचं वार्षिक वेळापत्रकच कोकणातील सणासुदीनुसार ठरतं असं म्हटलं तरी वावगणं ठरणार नाही. मात्र ज्या कोकणाबद्दल प्रत्येक मराठी माणसाला आपुलकी वाटते. त्या कोकणाला ‘कोकण’ हे नाव कसं पडलं? या नावाचा अर्थ काय होतं? हे नाव आलंय कुठून? याबद्दल फारच कमी लोकांना ठाऊक आहे. याबद्दलच जाणून घेऊयात…
कोकण भौगोलिक स्थान
कोकण किनारपट्टी कशाला म्हणतात हे भौगोलिक व्याख्याने समजून घेऊयात. सह्याद्रीच्या पर्वत रांगा आणि अरबी समुद्राच्या मध्यभागी असणारा दक्षिणोत्तर भूभाग म्हणजे कोकण!
नक्की वाचा >> पारनेर, संगमनेर, अमळनेर, पिंपळनेर… गावांच्या नावात ‘नेर’ का लावतात? या शब्दाचा नेमका अर्थ काय?
कोकण नाव आलं कुठून?
कोकणाचं दुसरं नाव परशुराम भूमी असं आहे. कोकणामध्ये ज्या देवी-देवतांना पुजलं जातं त्यामध्ये परशुरामाचं नाव आद्यस्थानी आहे. याच परशुरामाची आई होती रेणुका. रेणुकाची दुसरी ओळख म्हणजे ती जमदग्नीची पत्नी होती. या रेणुकेचं दुसरं नाव आहे कुंकणा! त्यामुळेच ज्या परशुरामाच्या नावाने कोकणला ओळखलं जातं त्या भूमीचं मूळ नाव परशुरामाच्या आईच्या नावावरच पडल आहे. म्हणजेच रेणुकेच्या कुंकणा या नावावरुनच या भागाला कोकण नाव मिळालं आहे.
…म्हणून अपरान्त नावाने ओळखलं जातं कोकण
कोकण भूमीलाच अपरान्त असंही म्हणतात. अपरा या संस्कृत शब्दाचा अर्थ पश्चिम दिशा असा आहे. अपरान्त म्हणजे पश्चिम दिशेकडील शेवटचा प्रदेश. कोकण हा भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील शेवटचा भूभाग म्हणून तो अपरान्त नावानेही ओळखला जातो.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.