
Gautami Patil React On Chandrkant Patil Phone Call Video: पुण्यातील वडगाव बुद्रुकमध्ये झालेल्या एका कार अपघाताची सध्या महाराष्ट्रभर चर्चा आहे. केवळ सर्वसामान्य नागरिकच नाही तर भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान मंत्री चंद्रकांत पाटलांनीही या प्रकरणात लक्ष घालत थेट पोलिसांना फोन करुन या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितलं आहे. या साऱ्या चर्चेमागील कारण म्हणजे अपघात ज्या कारमुळे झाली ती कार प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलची आहे. 30 सप्टेंबरच्या पहाटे ज्या कारने येथील स्थानिक रिक्षाला धडक दिली ती कार गौतमी पाटीलच्या नावावर असली तरी अपघाताच्या वेळी गौतमी कारमध्ये नव्हती असं पोलिसांनीच स्पष्ट केलं आहे. असं असलं तरी या प्रकरणामध्ये गौतमीला उचलणार कधी? असा सवाल चंद्रकांत पाटलांनी फोन कॉलवरुन या प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांना केल्याचा व्हिडीओ व्हायरल झालेला. त्यावर आता गौतमीने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. गौतमी वेगवेगळ्या प्रश्नांवर नेमकं काय म्हणालीये पाहूयात…
गौतमी म्हणते, मदत केलेली पण नाकारली
पीडित व्यक्तीच्या कुटुंबियांनी गौतमीने भावांच्या माध्यमातून केलेली मदत नाकारली. पीडित व्यक्तीच्या कुटुंबाने मदत का नाकारली याबद्दल बोलताना गौतमीने, “गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे त्यांनी मी देऊ केलेली मदत नाकारली,” असं सांगितलं. पुढे या प्रकरणात काय होणार याबद्दल भाष्य करताना गौतमीने, “जे कायदेशीर चालू आहे ते चालणार,” असंही स्पष्ट केलं.
पीडित कुटुंबाने केलेल्या आरोपांबद्दल काय म्हणाली?
पीडित कुटुंबाने केलेल्या आरोपांबद्दलही गौतमीने आपलं मत व्यक्त केलं. ” सगळे बसलेत आता माझ्यावर आरोप करायला. प्रत्येक वेळी मीच ट्रोल होत असते. सुरुवातीपासून आत्तापर्यंत मी ट्रोलमध्येच चालले आहे. जो तो येतो बोलून जातो. जे असेल ते आता न्यायाने सर्व व्यवस्थित होईल,” असं परखड मत गौतमीने व्यक्त केलं.
मदत करण्याची भावना होती का?
तुमची पीडित कुटुंबाला मदत करण्याची भावना होती का? असा सवाल गौतमीला विचारण्यात आला असता तिने, “मदतीची भावना होती म्हणूनच मी मदतीचा हात पुढे केला होता,” असं उत्तर दिलं. तसेच, “मी उद्या बाईट देणार आहे त्यात सविस्तर बोलेन,” असंही गौतमीने मंगळवारी रात्री नोंदवलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं.
नक्की वाचा >> ‘नको त्या गोष्टींचा..’, अपघातानंतर 8 दिवसांनी गौतमी पहिल्यांदाच जगासमोर, म्हणाली, ‘मी कारमध्ये..’
चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?
या प्रकरणामध्ये दाद मागण्यासाठी जखमी रिक्षाचलक विठ्ठल मरगळेची मुलगी आणि नातेवाईक अपघाताच्या दुसऱ्या दिवशीच स्थानिक भाजपा आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटलांकडे गेले होते. त्यावेळी त्यांनी नातेवाईकांसमोरच पोलिसांना फोन लावून या प्रकरणाची माहिती घेऊन काही सूचना केल्या. “हा, त्या गौतमी पाटीलला उचलायचंय की नाही?” असा पहिला सवाल चंद्रकात पाटलांनी फोन कॉलवर पोलीस अधिकाऱ्याला विचारला. चंद्रकांत पाटलांनी हा फोन पुण्याच्या पोलीस उपायुक्तांना केला होता.
नक्की वाचा >> ‘गौतमी पाटील, तू महाराष्ट्राचा बिहार केला! तुझे काळे धंदे…’; अभिनेत्याचा हल्लाबोल
त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी, “अरे पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही? आता हा रिक्षावाला सिरीअर आहे. तुम्ही म्हणालात गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये कोणीतरी ड्राइव्ह करत होतं की भूत ड्राइव्ह करत होतं? तो जो कोण ड्रायव्हर आहे त्याला पकडायला लागेल ना? पकडला? केस दाखल केली?” असं विचारलं. पोलिसांनी समोरुन सर्व घडामोडीची माहिती दिली. चंद्रकांत पाटलांच्या फोन कॉलचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालेला. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ…
कोथरूडचे आमदार पण भारीच आहेत. गौतमी पाटीलच्या गाडीने एकाला धडक दिली. यावेळी ती गाडीत नव्हती. पण कायद्याची अंमलबजावणी कडक झाली पाहिजे, यासाठी आग्रही असणारे दादा गजा मारणे आणि निलेश घायवळवर कारवाई करण्यासाठी तत्काळ फोन लावत नाहीत. कारण मतदानासाठी पोलिंग बूथवर ‘मॅन पॉवर’ लागते. 1/2 pic.twitter.com/Ta5dln2EQo
— Omkar Wable (@omkarasks) October 3, 2025
चंद्रकांत पाटलांच्या या विधानावर काय म्हणाली गौतमी?
“चंद्रकांत पाटलांना जे वाटलं ते ते बोलले. तो ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. कोणाला काय बोलायचं? त्यांना वाटलं त्यांनी तसं उत्तर दिलं,” असं गौतमीने चंद्रकांत पाटलांच्या विधानासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं. पुढे बोलताना, “माझं म्हणणं एवढंच आहे की जेव्हा अपघात झाला तेव्हा मी गाडीत नव्हते मी तिथे उपस्थित नव्हते. पीडित कुटुंबाशाठी माझ्या भावांनी मदतीचा हात पुढे केला होता,” असंही गौतमीने सांगितलं.
पीडित कुटुंबाशी चर्चा झाली का?
पीडित कुटुंबाशी तुमची चर्चा झाली का? असा सवाल गौतमीला विचारण्यात आला. या प्रश्नावर गौतमीने, “माझी चर्चा झाली नाही. माझ्या भावांची झाली. त्यांच्याशी ते संपर्कात आहेत. बोलत आहेत,” असं उत्तर दिलं. “आजचा लाखेवाडीमधील कार्यक्रम सुखरूप पार पडला आहे. लाखेवाडीकरांचे आभार मानले पाहिजे. आजचा कार्यक्रम होऊ देणार नाही उधळून लावणार असा इशारा होता. परंतु देवीच्या कृपेने देवीची यात्रा होते खूप छान कार्यक्रम झाला,” असंही गौतमी म्हणाली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.