digital products downloads

घोटाळेबाजांमुळे मेट्रो लाईनला उशीर झाला- पंतप्रधान मोदींचा आरोप

घोटाळेबाजांमुळे मेट्रो लाईनला उशीर झाला- पंतप्रधान मोदींचा आरोप

PM Narendra Modi: नवी मुंबई एअरपोर्ट विकसित भारताचं प्रतिकं आहे. शेतकरी, मासेमार यांना याचा फायदा होईल. यामुळे गुंतवणूक वाढेल. नवीन उद्योग येतील. मी महाराष्ट्रातील नागरिकांचे यासाठी अभिनंदन करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबई येथील कार्यक्रमात विकसित भारताच्या प्रगतीवर भाष्य केले. त्यांनी विजयादशमी आणि कोजागिरीच्या शुभेच्छांसह येणाऱ्या दिवाळीसाठी सर्वांना शुभकामना दिल्या. नवी मुंबई विमानतळ आणि मेट्रोसारख्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांचे कौतुक करत, त्यांनी महाराष्ट्राचे सुपुत्र दि.बा. पाटील यांच्या लोकसेवेला प्रेरणादायी म्हटले.

Add Zee News as a Preferred Source

2014 मध्ये देशात 74 विमानतळ होते, आज 160 पेक्षा जास्त आहेत, असे सांगत त्यांनी पायाभूत सुविधांच्या विस्तारावर भर दिला. जीएसटीमधील सवलतींमुळे खरेदी-विक्रीचे विक्रम मोडल्याचेही ते म्हणाले. 2008 च्या मुंबई हल्ल्यावेळी तत्कालीन सरकारने कमकुवतपणा दाखवला, असा आरोप करत, काँग्रेस नेत्याने हल्ला परदेशी दबावामुळे रोखल्याचा दावा केला होता, यावर स्पष्टीकरण मागितले. स्वदेशी वस्तूंचा वापर आणि भेटवस्तूंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन त्यांनी केले, ज्यामुळे रोजगार वाढेल आणि अर्थव्यवस्था बळकट होईल. कौशल्य विकासासाठी नवे निर्णय आणि पीएम सेतू योजनेचाही उल्लेख त्यांनी केला. 

भुयारी मेट्रो येथील विकासाचं प्रतिक आहे. दुसरं आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार असल्याने मोदी यावेळी म्हणाले. आज भारतात 160 च्या वर एअरपोर्ट आहे. देशातील छोट्या शहरात एअरपोर्ट बनले तर तिथल्या लोकांना हवाई प्रवासाची संधी मिळते. उडान योजनेअंतर्गत स्वस्तात प्रवास केला जातोय. 1 लाखाच्या वर लोकांना याचा फायदा घेतलाय. 

घोटाळेबाजांमुळे मेट्रोलाईनला उशीर झाला. मी भूमीपूजन केलं. पण लोकांना मेट्रोसाठी बराच काळ वाट पाहावी लागली, असे म्हणत मोदींनी कॉंग्रेस सरकारवर हल्लाबोल केलाय.   पण आता गुंतवणूक वाढत चाललीय. अटल सेतू, कोस्टल रोडसारखे प्रोजेक्ट आलेयत. लोकांना भटकण्याची वेळ येऊ नये. तिकिटांसाठी वेगळी रांग लावण्याची गरज नसेल. एकच तिकिट घेऊन तुम्हाला प्रवास करता येणार आहे. 

कॉंग्रेसच्या बड्या नेत्याने मोठा खुलासा केला. मुंबई हल्ल्यानंतर आमचे सैन्य पाकिस्तानवर हल्ला करण्यास तयार होता, असे त्यांनी सांगितले. संपूर्ण देशाला हेच हवं होतं. पण दुसऱ्या देशाच्या दबावामुळे पाकिस्तानवर हल्ला करणं रोखण्यात आलं. विदेशी दबावात निर्णय घेणारा कोण? हे कॉंग्रेसने सांगावं, असे मोदी म्हणाले. आजचा भारत घरात घुसून मारतो. तात्काळ उत्तर देतोय. हे जगाने ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाहिलं देखील असेल. 

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना स्वदेशीचा नारा दिला. स्वदेशी वस्तूच खरेदी करा. स्वदेशी वस्तूच एकमेकांना गिफ्ट करा. यामुळे पैसा देशातच राहीलं. आणि इथल्या तरुणांना रोजगार मिळेल, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. 

FAQ

प्रश्न: नवी मुंबई विमानतळाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय सांगितले?

उत्तर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबई विमानतळाला विकसित भारताचे प्रतीक म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, या विमानतळामुळे शेतकरी, मासेमार आणि स्थानिकांना फायदा होईल, गुंतवणूक वाढेल आणि नवीन उद्योगांना चालना मिळेल. यासोबतच, भारतात सध्या १६० पेक्षा जास्त विमानतळ असून, उडान योजनेअंतर्गत स्वस्त हवाई प्रवासामुळे १ लाखाहून अधिक लोकांना लाभ झाला आहे.

प्रश्न: पंतप्रधानांनी मुंबई कॉंग्रेस सरकारबाबत काय टीका केली?

उत्तर: पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेस सरकारवर घोटाळ्यांमुळे मेट्रो प्रकल्पाला उशीर झाल्याची टीका केली. त्यांनी सांगितले की, त्यांनी मेट्रोचे भूमिपूजन केले होते, परंतु घोटाळ्यांमुळे लोकांना मेट्रो सेवेसाठी बराच काळ वाट पाहावी लागली. तसेच, आता अटल सेतू आणि कोस्टल रोडसारख्या प्रकल्पांमुळे गुंतवणूक वाढत असून, एकाच तिकिटाने प्रवास सुलभ होईल, ज्यामुळे तिकिटांसाठी रांगा लावण्याची गरज भासणार नाही.

प्रश्न: पंतप्रधानांनी स्वदेशी आणि सुरक्षा धोरणाबाबत काय मत मांडले?

उत्तर: पंतप्रधान मोदी यांनी स्वदेशी वस्तूंच्या खरेदी आणि भेटवस्तू म्हणून वापरावर जोर दिला, ज्यामुळे पैसा देशात राहील आणि तरुणांना रोजगार मिळेल. सुरक्षेच्या मुद्द्यावर, त्यांनी कॉंग्रेसच्या नेत्याच्या दाव्यावर टीका केली की, मुंबई हल्ल्यानंतर सैन्य पाकिस्तानवर हल्ला करण्यास तयार होते, परंतु परदेशी दबावामुळे ते थांबवले गेले. मोदी यांनी सांगितले की, आता भारत तात्काळ आणि कठोर कारवाई करतो, जसे की ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान जगाने पाहिले.

 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp