digital products downloads

‘चंद्रग्रहणाची रात्र, वरळी स्मशानभूमी आणि 2 बकरे’ रामदास कदमांचे अनिल परबांवर खळबळजनक आरोप!

‘चंद्रग्रहणाची रात्र, वरळी स्मशानभूमी आणि 2 बकरे’ रामदास कदमांचे अनिल परबांवर खळबळजनक आरोप!

Ramdas Kadams: दसरा मेळाव्यात शिवसेना ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप केले. याला प्रत्युत्तर देत अनिल परबांनी रामदास कदमांवर आरोप केले. दरम्यान आता रामदास कदमांनी अनिल परबांसंदर्भात गौप्यस्फोट केलाय. वरळी स्मशानभूमीत अनिल परबांनी 2 बकरे कापले का? असा प्रश्न रामदास कदमांनी विचारला.

Add Zee News as a Preferred Source

काय म्हणाले रामदास कदम?

शिवसेना नेते रामदास कदम यांनी माजी मंत्री अनिल परब यांच्यावर खळबळजनक आरोप करत राजकीय वातावरण तापावले आहे. पत्रकार परिषदेत कदम यांनी परब यांना ‘अर्धवट वकील’ संबोधले. तसेच चंद्रग्रहणाच्या रात्री वरळी स्मशानभूमीत दोन बकरे कापल्याचा आणि दोन नंगे बाबांसोबत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला

“अनिल परब तिथे तुम्ही काय करत होता? हे चुकीचे आहे,” असे रामदास कदमांनी म्हटले. कदम यांनी १९९३ च्या पत्नीच्या आत्महत्येच्या प्रकरणावरूनही संताप व्यक्त करत, “माझी पत्नी खेडला स्वयंपाक करत असताना दोन मजल्याचा भडका उडाला. हे बदनामीचा प्रयत्न आहे. मी 100 टक्के न्यायालयात जाईन आणि CBI चौकशीची मागणी करणार,” असे सांगितले. 

उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर टीका

कदम यांनी उद्धव ठाकरे यांचा थेट उल्लेख केला. “बाळासाहेब गेल्यानंतर मला बोलू का दिले नाी? मंत्रिपद काहीतरी द्यायचे म्हणून दिले, नाईलाज होता म्हणून घेतले. अनिल परबला मातोश्रीचा हिस्सा दिलाय का?” बाळासाहेबांच्या पार्थिवासोबत ‘गद्दारी’ केल्याचा आरोप करत, “तूच नमक हराम गद्दारी केलीस, असे कदम म्हणाले. जसलोकमध्ये साहेब स्वतः आले होते, माझी बदनामी करू नका,” असे म्हटले. तसेच, “मी 50 वर्षे मातोश्रीवर काढली, याप्रकरणी स्वतः उद्धव बोलावेत, चेले-चमचे बोलू नयेत.” जयदेव थोरात यांच्या आक्षेपाकडेही लक्ष वेधले.

CBI चौकशीची मागणी

डान्सबार प्रकरणावर कदम यांनी स्पष्ट केले, “तो बार नव्हता, ऑर्केस्ट्रा होता. विक्षिप्त हावभाव करणाऱ्या मुलीमुळे बंद केला. हे मानहानीचा प्रयत्न आहे.” डॉक्टरांच्या संदर्भात परबांच्या टिप्पणींवर, “मी डॉक्टरांचा उल्लेख केला, परब ते डॉक्टरांवरही दावा करणार का?” उद्या मुख्यमंत्र्यांना भेटून CBI चौकशीची मागणी करणार असल्याचे सांगत, “माझी महाराष्ट्रात मानहानी झाली,” असे ते म्हणाले.

सुडाचे राजकारण

“तू आधी सांग, बकरे किती कापले?” आणि “राजीनामा दे, तुझ्या बापाचं आहे?” असे विचारत कदम यांनी अनिल परबांवर हल्ला चढवला. “हे सुडाचे राजकारण आहे. योगेश कदमला पाडण्यासाठी प्रयत्न केले, पण तो नाकावर टिच्चून आला असे म्हणत त्यांनी पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. “एखादा आमदार आरोप करतो आणि अध्यक्ष बघत राहतो? हे कधी पाहिले नाही,” असे ते म्हणाले..

पुतण्याची आत्महत्या?

एकनाथ शिंदे यांच्या गप्प राहण्यावर कदम यांनी, “त्यांना मान्य आहे ही गोष्ट. त्यांनी मला फोन केला होता. मी पक्षाचा सिनियर नेता आहे,” असे म्हटले. “आमच्या कोणत्याही पुतण्याने आत्महत्या केली नाही. हा बदनामीचा प्रयत्न आहे. भाड कोणी खाल्ले हे महाराष्ट्राला माहिती. भडखाऊ कोण हे सर्वांना माहीत. नेत्यांना संपविण्यासाठी भाड खाल्ले, अपक्षांना मंत्री केले,” असे आरोप केले.

FAQ

प्रश्न: रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर कोणते खळबळजनक आरोप केले आहेत?

उत्तर: रामदास कदम यांनी अनिल परब यांना ‘अर्धवट वकील’ संबोधत त्यांच्या पत्रकार परिषदेत ‘अज्ञानाचे प्रदर्शन’ केल्याचा आरोप केला. तसेच, चंद्रग्रहणाच्या रात्री वरळी स्मशानभूमीत दोन बकरे कापल्याचा आणि दोन नंगे बाबांसोबत असल्याचा संशय व्यक्त करत, “तिथे तुम्ही काय करत होता? हे चुकीचे आहे,” असे सांगितले. त्यांनी परब यांना मातोश्रीचा मालक बनल्याचा टोमणा मारला आणि उद्धव ठाकरे यांना स्वतः बोलण्याचे आवाहन केले.

प्रश्न: १९९३ च्या पत्नीच्या आत्महत्येच्या प्रकरणावर कदम यांचे काय म्हणणे आहे?

उत्तर: कदम यांनी १९९३ च्या प्रकरणावर स्पष्टीकरण देत सांगितले की, “माझी पत्नी खेडला स्वयंपाक करत असताना दोन मजल्याचा भडका उडाला. हे बदनामीचा प्रयत्न आहे.” याविरोधात ते १०० टक्के न्यायालयात जाणार असून, CBI चौकशीची मागणी करणार आहेत. तसेच, त्यांनी आपल्या पत्नीच्या प्रकरणावरून झालेल्या मानहानीविरोधात कायदेशीर कारवाईची घोषणा केली.

प्रश्न: डान्सबार प्रकरण आणि विधानसभेतील वादाबाबत कदम यांचे काय स्पष्टीकरण आहे?

उत्तर: कदम यांनी डान्सबार प्रकरणावर सांगितले की, “तो बार नव्हता, ऑर्केस्ट्रा होता. विक्षिप्त हावभाव करणाऱ्या मुलीमुळे आम्ही बंद केला.” विधानसभेत परबांवर हल्ला चढवत, “बकरे किती कापले?” आणि “राजीनामा तुझ्या बापाचं आहे?” असे विचारले. त्यांनी हे सुडाचे राजकारण असल्याचा आरोप केला, विशेषतः योगेश कदम यांच्याबाबत, आणि विधानसभा अध्यक्षाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत CBI चौकशीची मागणी केली.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp