digital products downloads

चर्चेवरून टोलवाटोलवी, जरांगेंसोबत चर्चा करण्यासाठी सरकार तयार, पण…

चर्चेवरून टोलवाटोलवी, जरांगेंसोबत चर्चा करण्यासाठी सरकार तयार, पण…

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या चर्चेवरून मनोज जरांगे-राधाकृष्ण विखे पाटील आमनेसामने आले आहेत. मराठा समाजाच्या मागण्या आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर तोडगा यासंदर्भात मराठा उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील आणि मनोज जरांगेंमध्ये चर्चा होणार होती. मात्र, या चर्चेला अजून मुहूर्त मिळालेला नाही.

Add Zee News as a Preferred Source

मराठा आरक्षणाच्या चर्चेवरून मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे पाटलांमध्ये चांगलीच जुंपलीय. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करून आंदोलनावर काही तोडगा निघू शकतो यासाठी सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा करणार होतं. 

मात्र, मनोज जरांगे यांचा मोर्चाचा आज दुसरा दिवस आहे. तरीही मनोज जरांगेंसोबत अजून कोणी चर्चा केलेली नाही. मनोज जरांगेंची इच्छा झाल्यास त्यांच्यासोबत चर्चा करू असं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलं आहे. तर आम्ही कधी चर्चेला ना केली? असा सवाल त्यांनी केला. 

…तरच चर्चेला अर्थ

मनोज जरांगेंनी दिलेल्या प्रत्युत्तरानंतर राधाकृष्ण विखे पाटलांनी देखील चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे.  चर्चा करून आंदोलन स्थगित करणार असतील तरच चर्चेला अर्थ असल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलं आहे.

मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय माघारी फिरणार नसल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. तर दुसरीकडे अजूनही सरकार आणि शिष्टमंडळाची चर्चा झालेली नाही. मात्र, गरज पडल्यास चर्चा करायला तयार असल्याचं आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. बुधवारी फडणवीसांच्या ओएसडींनी जरांगेंसोबत चर्चा केली आहे. तर दुसरीकडे शिष्टमंडळ आणि जरांगे यांच्यात अद्यापही चर्चा झालेली नाही. तसंच चर्चा करण्यावरून जरांगे आणि विखे पाटलांमध्येही जुंपली आहे.

FAQ

1. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील वाद काय आहे?

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून 10% आरक्षण मिळावे यासाठी आक्रमक आंदोलन सुरू केले आहे, तर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आंदोलन स्थगित करण्याची अट ठेवली आहे. जरांगे यांनी चर्चेला नकार दिला नसल्याचे सांगितले, परंतु विखे पाटील यांनी “चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची तयारी असेल तरच चर्चेला अर्थ आहे” असे मत व्यक्त केले आहे.

2. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची सध्याची स्थिती काय आहे?

मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट 2025 पासून मुंबईतील आझाद मैदानावर अनिश्चित काळासाठी उपोषण आणि आंदोलन जाहीर केले आहे. 28 ऑगस्ट 2025 रोजी ते अंतरवाली सराटीहून हजारो समर्थकांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने आझाद मैदानावर आंदोलनास मनाई केली असून, नवी मुंबईत पर्यायी जागेचा सुझाव दिला आहे. मुंबई पोलिसांनी फक्त एका दिवसाची (29 ऑगस्ट) परवानगी दिली आहे, जी जरांगे यांनी मान्य नसल्याचे सांगितले.

3. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत काय भूमिका घेतली आहे?

राधाकृष्ण विखे पाटील यांनी 26 ऑगस्ट 2025 रोजी मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर सांगितले की, जरांगे यांच्या मागण्यांवर प्राथमिक चर्चा झाली आहे, आणि हैदराबाद गॅझेटबाबत शिंदे समितीला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याची जरांगे यांची मागणी मान्य केली आहे. तसेच, मराठा आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्या 9 व्यक्तींच्या नातेवाईकांना पुढील तीन महिन्यांत सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले. त्यांनी सरकारची भूमिका सकारात्मक असल्याचे सांगितले, परंतु कायद्याच्या चौकटीतच तोडगा काढला जाईल असे स्पष्ट केले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp