digital products downloads

चिंता वाढणार! ताशी 295 किमी वेगाने विदर्भाच्या दिशेने घोंगावतोय ‘रागासा’ चक्रीवादळ, 30 सप्टेंबरपर्यंत पावसाचा कहर

चिंता वाढणार! ताशी 295 किमी वेगाने विदर्भाच्या दिशेने घोंगावतोय ‘रागासा’ चक्रीवादळ, 30 सप्टेंबरपर्यंत पावसाचा कहर

महाराष्ट्रातील विदर्भात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. मोठ्या चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्राला पडणार आहे. प्रति ताशी 295 किमी वेगानं हे वादळ महाराष्टाकडे मार्गक्रमण करत आहे. ज्याचा फटका शेतकऱ्यांना पडणार आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील विदर्भाला पॅसिफिक महासागरातील चक्रीवादळ या धुमशान घालणाऱ्या पावसाला कारणीभूत ठरत आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार ते पाहूया. 

Add Zee News as a Preferred Source

कुठून आलं हे चक्रीवादळ

पॅसिफिक महासागरात रागासा हे चक्रीवादळ घोंगावत आहे. या चक्रीवादळाला टायफून म्हणून ओळखलं जातं. हे टायफून या वर्षाचं जगातील सर्वात तीव्र वादळ आहे. या वादळाचा परिणाम बंगालच्या उपसागरात दाखल झालं आहे. 25 सप्टेंबरनंतर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

तीन दिवसांनी पावसाचा जोर वाढणार 

बंगालच्या उपसागरात आधीच एक कमी दाबाचं क्षेत्र आहे. तर तीन दिवसांनी ही नवीन प्रणाली तयार होणार आहे. याचा प्रभाव ओडिशा, आंध्रप्रदेशासोबतच विदर्भावर होणार आहे. त्यामुळे पाऊस वाढण्याची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यातही पावसाची शक्यता आहे. 

महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांना पडणार फटका? 

जळगाव, अहिल्यानगर, नाशिक, संभाजी नगर, बीडमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आळा आहे. तर राज्यात इतर जिल्ह्यात यलो अलर्ट दिला आहे. दरम्यान इतर जिल्ह्यांमध्ये देखील सरी कोसळतील. दरम्यान, हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसाठी पाच दिवसांचा अंदाज जारी केला आहे. पुढील पाच दिवस या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने जारी केला आहे. मंगळवारी मुंबईत झालेल्या पावसाने जनजीवन आधीच विस्कळीत केले आहे.

हवामान खात्याने जारी केलेल्या अलर्टनुसार, बंगालच्या उपसागरावर दाब निर्माण होत आहे आणि अरबी समुद्रातील अशांततेमुळे बंगाल, झारखंड, ओडिशा आणि कोकण प्रदेशात मुसळधार पाऊस पडत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या खोल कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम केवळ बंगालच नाही तर झारखंड आणि ईशान्येकडील राज्यांवरही होत आहे.

मुंबईत कसा असेल पाऊस? 

मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा, जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसाठी अलर्ट जारी केला आहे. पुढील पाच दिवस या चार भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागात गडगडाटी वादळे, जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी झालेल्या पावसाने पुन्हा एकदा मुंबईच्या गतीला ब्रेक लावला. पवई आणि मुलुंडसह अनेक भागात मुसळधार पाणी साचल्याने रहिवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. शहरातील वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे.

पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिलेला असून पुढील ३ तासांत अहमदनगर, नाशिक, पुणे येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळे आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. वरील माहिती सचेत अँप वरून घेतलेली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp