
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध भागांना अतिवृष्टीचा देखील फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यासह विदर्भालाही पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. छत
.
संभाजीनगर येथील वेरूळ घाटात झाड कोसळल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी एका कंटेनरचा अपघात झाला होता. त्याच ठिकाणी आता झाड कोसळले आहे. यामुळे घाटात वाहतुकीचा खोळंबा झाला होता. येथील स्थानिक ग्रामस्थांनी तसेच लामनगाव येथील पीकअप चालक संदीप पवार यांच्या मदतीने झाड हटवण्यात आले. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी तसेच दुर्घटना घडली नाही.
दरम्यान, तेलंगणा आणि विदर्भाच्या सीमेवर तयार झालेल्या द्रोणीय स्थितीमुळे राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे. 20 सप्टेंबर रोजी देखील राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील एकूण 20 जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड वगळता उर्वरित छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी आणि लातूर या सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील या सहा जिल्ह्यांत विजांसह आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातील सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पूर्व विदर्भात नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या चार जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या चारही जिल्ह्यांमध्ये विजांसह आणि 30 ते 40 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर या पाचही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या पाचही जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.