
जालना येथील गांधी चमन परिसरात एका संस्थाचालकाकडून 70 लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. या प्रकरणाचा पर्दाफाश करत तिघांकडून 21 लाख 4 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आता उ
.
संस्थाचालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांनी संगनमत करत संस्थाचालकाला धमकी देत 70 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यावर त्यांनी तातडीने कारवाई करत तीन आरोपींना अटक केली. अटक केल्यावर आरोपींकडून 21 लाख 4 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जालना शहरातील गांधी चमन भागात एका संस्थाचालकाकडून सुमारे 70 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून 7 लाख 91 हजार 500 रुपये रोख रक्कम, 10 लाख रुपये किमतीची कार, 1,200 रुपयांचे लायटर, खंडणीच्या पैशातून खरेदी केलेले 1 लाख 7 हजार रुपयांचे दागिने आणि 2 लाख 5 हजार रुपये किमतीचे मोबाईल असा एकूण 21 लाख 4 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संस्थाचालकाच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच, अटकेत असलेल्या तिघांवर यापूर्वी गुन्हे दाखल होते का, याचा तपासही पोलीस करत आहेत.
दरम्यान, खंडणीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या देखील खंडणी प्रकरणातून झाली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरले होते. आरोपींनी इतक्या अमानुषपणे संतोष देशमुख यांना मारहाण केली होती, ते पाहून संतापाची लाट उसळली होती. वाल्मीक कराडला या प्रकरणात अटक करण्यात आली असून मकोका अंतर्गत कारवाई सुरू आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.