
छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी उशिरा येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची चांगलीच हजेरी लावली आहे. फुलंब्री येथील तहसील कार्यालयात दिलीप स्वामी हे सकाळीच जाऊन खुर्ची टाकून हातात हजेरीचे रजिस्टर घेऊन बसले. उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची चा
.
फुलंब्रीच्या तहसील कार्यालयात सकाळी 10 च्या आत केवळ तीनच कर्मचारी आले होते. त्यामुळे जोपर्यंत पूर्ण कर्मचारी येत नाहीत, तोपर्यंत हजेरी रजिस्टर घेऊन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी स्वतः कार्यालयाच्या बाहेर बसले होते. पंचायत समिती अंतर्गत 40 कर्मचारी काम करतात, यापैकी केवळ 10 कर्मचाऱ्यांची सकाळी दहा वाजता कार्यालयात उपस्थिती होती. भूमी अभिलेख, सहाय्यक निबंधक, पुरवठा विभाग, दारूबंदी विभाग, कृषी विभाग या कार्यालयातील अनेक कर्मचारी गैरहजर होते. गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापण्यात येणार असून त्याची नोंदही सर्व्हिस बूकमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती दिलीप स्वामींनी दिली.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यांच्या या व्हिडिओवर सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी धडा घेतला पाहिजे, अशा आशयाच्या कमेंटही आल्या आहेत. काहींनी सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल संतापही व्यक्त केला आहे. आता तरी कर्मचाऱ्यांनी वेळेत पोहोचून नागरिकांची कामे मार्गी लावावीत, असा सल्लाही अनेकांनी दिला आहे.
सरकारी काम अन् 6 महीने थांब अशी म्हण प्रचलित आहे. याचे कारण सरकारी कर्मचारी कधीच वेळेवर कार्यालयात जात नाहीत तसेच त्यांच्याकडून नागरिकांचे काम लगेच होईल याची शाश्वतीही नसते. सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांना सकाळी 10 वाजता कार्यालयात पोहोचणे बंधनकारक असते, परंतु असे होताना दिसत नाही. याचा प्रत्यय फुलंब्रीच्या तहसील कार्यालयात पाहायला मिळाला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.