
अमरावती जिल्हा परिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तू आणि मौल्यवान वस्तूंच्या देखभालीकडे दुर्लक्ष, पाझर तलावातील गाळ काढण्यात अनियमितता, कर्मचाऱ्याचे सेवापुस्तक गहाळ होणे अशा अनेक गंभीर समस
.
सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या तक्रार निवारण दिनी नऊ नागरिकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र यांच्यासमोर आपली गाऱ्हाणी मांडली. यामध्ये दवाखाना आणि घरकुल इमारतींच्या बांधकामातील त्रुटी, हक्क नोंदणीनंतर आठ-अ नमुना न मिळणे, तसेच एका ग्रामपंचायतीत बेकायदेशीर लिपिकाच्या नियुक्तीचा समावेश होता.
सीईओ महापात्र यांनी स्वतः तक्रारी ऐकून घेतल्या आणि संबंधित विभागप्रमुखांना त्वरित कार्यवाहीचे निर्देश दिले. काही प्रकरणांमध्ये ३ मार्च तर उर्वरित प्रकरणांमध्ये २० मार्चपर्यंत निराकरण करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हा परिषदेने दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी १०.३० ते २.३० या वेळेत तक्रार निवारण दिन आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. बांधकाम, पंचायत, आरोग्य, शिक्षण, लघुसिंचन आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेशी संबंधित तक्रारींचे निराकरण या माध्यमातून केले जाणार आहे. ग्रामीण भागातील विविध योजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सीईओ महापात्र यांनी सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.