digital products downloads

‘जीआर’विरोधातील याचिकेमुळे मराठ्यांचं आरक्षण जाणार? जरांगे म्हणाले, ‘मराठ्यांनी आता जास्त…’

‘जीआर’विरोधातील याचिकेमुळे मराठ्यांचं आरक्षण जाणार? जरांगे म्हणाले, ‘मराठ्यांनी आता जास्त…’

Manoj Jarange On Maratha Reservation GR: मराठा समाजाने आरक्षणासंदर्भात केलेल्या आठपैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य करत त्यासंदर्भात शासन आदेशही जारी केले आहेत. या निर्णयामुळे पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेत समाधान व्यक्त केलं आहे. मंगळवारी सायंकाळी राज्यभरातील वेगवेगळ्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासंदर्भातील सहा महत्त्वाच्या मागण्या मान्य करण्यात आल्याच्या मुद्द्यावरुन सेलिब्रेशन मराठा बांधवांनी केलं. मात्र या जीआरला आता ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी तर या जीआरविरोधात न्यायालयात जाण्यासंदर्भात विधान केलं आहे. असं असतानाच या पुढील संभाव्य न्यायालयीन लढाईबद्दल जरांगेंनी छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत भाष्य केलं. 

Add Zee News as a Preferred Source

सुधारीत जीआर काढण्याचा शब्द

मराठा आरक्षणाविरोधात याचिका कारणाऱ्या विनोद पाटील यांच्यासहीत मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना जरांगेंनी टोला लगावला. “काहींचं पोट दुखतं त्यांना राजकारण करायचं होतं. हे लोक कधीच आपल्या बाजूने बोललेले नाहीत,” असं जरांगे म्हणाले. “सरकारने काढलेल्या जीआरमध्ये काही कमी असेल तर सरकारकडून सुधारीत जीआर काढण्याचा शब्द घेतला आहे. कुणीही नाराज होऊ नये. वकील, तज्ज्ञांच्या सल्ल्याने जीआर हातात घेतला आहे,” असं जरांगेंनी समर्थकांना सांगितलं.

जीआरविरोधातील याचिकांबद्दल जरांगे काय म्हणाले?

मराठा आरक्षणासंदर्भात याचिका दाखल करण्यात आल्याने जीआर रद्द झाल्यावर शासनाने केलेल्या तरतुदी रद्द होणार का? यासंदर्भात काही समाज बांधवांमध्ये संभ्रम आहे. मराठा आरक्षणासंदर्भात काढलेल्या जीआरवर हरकत घेणारी याचिका दाखल करण्यात आल्यासंदर्भात जरांगेंना आज पत्रकारपरिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना जरांगेंनी, “निर्भीड राहा. गेले मराठे आरक्षणात. झाले सरसकट आरक्षित. सगे सोयऱ्याच्या अध्यादेशावर अभ्यास सुरू झाला आहे. सगे सोयरे अंमलबजावणी पाहिजे अशी मागणी मी केली आहे. फालतू 2-4 अभ्यासकांचे डोके खराब झाले आहे,” असं उत्तर दिलं. 

नक्की वाचा >> ‘भुजबळ मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बाहेर पडले याचा अर्थ मराठे…’, जरांगेंचा टोला; ‘आपले काही लोक शत्रूच्या…’

सगे-सोयरेबद्दलही बोलले

“मी सगे-सोयरे पण सोडणार नाही. मराठा कुणबी एकच आहे हे पण सोडणार नाही,” असा शब्द जरांगेंनी समर्थकांना दिला. “कितीही याचिका दाखल केल्या तरी चॅलेंज होणार नाही. सरकारी नोंदी असतील सरकारी दस्तावेज धुडकावून लावता येत नाही. दस्तावेज नाकारता येत नाही. मराठ्यांनी आता जास्त आनंदात राहावे. समाजाचे वाटोळे करणाऱ्यांना लोटावे लागणार,” असं आवाहन जरांगेंनी समाजाला केलं आहे.

नक्की वाचा >> …तर जीआर रद्द होऊ शकतो! GR आणि कायद्यामधील मूलभूत फरक मराठा आरक्षणामुळे चर्चेत; समजून घ्या अर्थ

FAQ

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन का मागे घेतले?
सरकारने 6 मागण्या मान्य केल्यानंतर आणि जीआर जारी केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी 2 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतील आझाद मैदानावरील पाच दिवसांचे उपोषण मागे घेतले. त्यांनी समाधान व्यक्त करत छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेतली.

मराठा आरक्षणाच्या जीआरला कोणी विरोध केला आहे?
मंत्री छगन भुजबळ यांच्यासह काही ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या जीआरला विरोध केला आहे. भुजबळ यांनी हा जीआर कायदेशीर कसोटीवर टिकणार नाही आणि यामुळे ओबीसींच्या हक्कांवर परिणाम होईल, असे म्हणत न्यायालयात जाण्याची घोषणा केली आहे.

जरांगे यांनी जीआरविरोधातील याचिकांबाबत काय म्हटले?
जरांगे यांनी मराठा समाजाला निर्भीड राहण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, कितीही याचिका दाखल झाल्या तरी सरकारी नोंदी आणि दस्तऐवज नाकारता येणार नाहीत. त्यामुळे जीआर रद्द होण्याची शक्यता नाही आणि मराठे सरसकट आरक्षणात समाविष्ट झाले आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp