digital products downloads

जैन समाजासाठी कबुतरखान्यावर पोहचलेले लोढा मराठी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर म्हणाले, ‘मी आज…’

जैन समाजासाठी कबुतरखान्यावर पोहचलेले लोढा मराठी आंदोलकांना ताब्यात घेतल्यानंतर म्हणाले, ‘मी आज…’

Mangal Prabhat Lodha On Marathi Ekikaran Samiti Protest At Dadar Kabutar Khana: मुंबईतील दादरमधील कबुतरखान्याजवळ आज मराठी एकीकरण समितीने कबुतरांना दाणे टाकू नये या निर्णयाच्या समर्थनार्थ आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला. मात्र हे आंदोलन सुरु करण्याआधीच आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. आंदोलन करुन न दिल्याने आंदोलकांनी संताप व्यक्त करतानाच 6 ऑगस्ट रोजी जैन समाजातील लोकांनी या ठिकाणी एकत्र जमून ताडपत्री फाडण्यापासून ते कायद्याचं उल्लंघन करत कबुतरांना दाणे टाकण्यापर्यंतच्या घडामोडी घडल्या तेव्हा पोलीस कुठे होते? असा सवाल आंदोलकांनी विचारला आहे. 6 ऑगस्ट रोजी आंदोलन झाल्यानंतर जैन समाजासाठी कबुतरखान्याजवळ पोहोचलेले पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावरही मराठी आंदोलकांनी नाराजी व्यक्त करत टीका केली. विशेष म्हणजे एकीकडे मराठी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेत असतानाच दुसरीकडे मंगल प्रभात लोढांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

मुंबईची मराठी ओळख पुसण्याचा लोढांच्या माध्यमातून प्रयत्न; मराठी आंदोलकांचा आरोप

मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर आंदोलकांनी लोढांवर टीकास्त्र सोडलं. मुंबईची मराठी ओळख पुसण्याचं काम लोढा पालकमंत्री झाल्यापासून केलं जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. “जेव्हापासून मुंबईमध्ये मंगलप्रभात लोढणं जे अडकलं आहे ना तेव्हापासून पूर्ण मुंबई प्रदेश आणि हे मराठी भाषिक राज्य असल्याची ओळख पुसण्याचं सातत्याने काम होत आहे. हे मराठी माणसाला आता समजू लागलेलं आहे. म्हणून हा आजचा मोर्चा काढण्यात आलेला आहे. या कथाकथित खोटे दावे करत जैन धर्माच्या नावाखाली जो अतिरेक चालला आहे तो थांबवायला पाहिजे यासाठी आज आम्ही निवेदन दिलं आहे,” असं आंदोलकांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना म्हटलं. 

लोढा काय म्हणाले?

एकीकडे या आंदोलकांची धरपकड सुरु असताना दुसरीकडे, आज उच्च न्यायालयामध्ये कबुतरखाना प्रकरणावर सुनावणी आहे. तसेच मराठी एकीकरण समितीने आंदोलन सुरु केलं आहे, याचा संदर्भ देत लोढांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. जे जैन मुनी आहेत ते म्हणत आहेत जे कोणी विरोध करतात त्यांना मी ओळखत नाही, असा संदर्भ देत लोढांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला.

नक्की वाचा >> ‘मराठी माणसाचं रक्त…’, कबुतरखाना राड्यानंतर गोवर्धन देशमुखांचा गंभीर आरोप; ‘गृहमंत्र्यांनी पोलिसांना…’

यावर प्रतिक्रिया देताना, “मी सर्व पत्रकारांना सांगू इच्छितो की पत्रकार म्हणून तुमची जी जबाबदारी आहे ती समजून घेत प्रश्न विचारा. मी त्याचं स्वागत करतो,” असा सल्ला लोढांनी दिला. “पण याबद्दल आज माझी भूमिका ही आहे की याबद्दल मी आज काही बोलणार नाही,” असं सांगत लोढा पत्रकारांना टाळून पुढे निघून गेले. 

FAQ

मराठी एकीकरण समितीने दादर कबुतरखाना येथे आंदोलन का आयोजित केले?
मराठी एकीकरण समितीने उच्च न्यायालयाच्या कबुतरखाने बंद करण्याच्या आणि कबुतरांना दाणे टाकण्यावर बंदी घालण्याच्या निर्णयाच्या समर्थनार्थ 13 ऑगस्ट 2025 रोजी आंदोलन पुकारले. त्यांनी कबुतरांमुळे होणाऱ्या आरोग्य समस्यांविरोधात आणि जैन समाजाच्या आंदोलनाविरुद्ध निषेध नोंदवला.

पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांवर काय कारवाई केली?
13 ऑगस्ट 2025 रोजी आंदोलन सुरू होण्याआधीच पोलिसांनी मराठी एकीकरण समितीच्या आंदोलकांना ताब्यात घेतले, ज्यात समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांचाही समावेश आहे. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला, आणि पोलिसांनी 150 कर्मचाऱ्यांसह दंगल नियंत्रण पथक तैनात केले होते.

मराठी एकीकरण समितीने जैन समाजाविरुद्ध कोणता आरोप केला?
समितीने 6 ऑगस्ट 2025 रोजी जैन समाजाने कबुतरखाना बंदीविरुद्ध आंदोलन केले, त्या वेळी ताडपत्री चाकूने फाडली, पोलिसांना धक्काबुक्की केली आणि शस्त्र उगारण्याची धमकी दिली, तरीही पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही, असा आरोप केला. याउलट, समितीच्या शांततामय आंदोलनावर तात्काळ कारवाई झाल्याने पोलिसांच्या दुटप्पीपणावर टीका केली.

6 ऑगस्ट 2025 रोजी जैन समाजाच्या आंदोलनात काय घडले?
6 ऑगस्ट 2025 रोजी जैन समाजाने दादर कबुतरखाना बंदीविरुद्ध आंदोलन केले. त्यांनी पालिकेने लावलेली ताडपत्री चाकूने फाडली, बांबू तोडले, कबुतरांना दाणे टाकले आणि पोलिसांना धक्काबुक्की केली. जैन मुनि निलेशचंद्र यांनी शस्त्र उगारण्याची धमकी दिली, परंतु पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.

मराठी एकीकरण समितीने मंगल प्रभात लोढा यांच्यावर कोणती टीका केली?
समितीने आरोप केला की, मंगल प्रभात लोढा मुंबईचे पालकमंत्री झाल्यापासून मुंबईची मराठी ओळख पुसण्याचे आणि मराठी भाषिकांवर अन्याय करण्याचे प्रयत्न करत आहेत. जैन समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन आणि मराठी आंदोलकांवर कारवाई करून त्यांनी मराठी माणसाला दुखावल्याचा दावा समितीने केला.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp