
टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी करणे ही जिहादी मानसिकता दर्शवते. टिपूने लाखो हिंदूंना धर्मांतर केले, मंदिरे नष्ट केली आणि केवळ इस्लाम प्रसारावर लक्ष केंद्रित केले. तो आमच्या शिवरायांच्या पायाशीही येऊ शकत नाही, असे म्हणत मंत्री नीतेश राणे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या टिपू सुलतानबाबतच्या वादग्रस्त विधानावर टीका केली आहे. नीतेश राणेंनी पुढे म्हटले आहे की, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आपल्या कार्यालयात शिवरायांचे फोटो काढून फक्त टिपूचे लावले तर बघू, महाराष्ट्रातील मावळे त्यांना कसे परवानगी देतात. हर हर महादेव! असे म्हटले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानचे शौर्य छत्रपती शिवाजी महाराजांसारखेच आहे, असे वक्तव्य केल्याने नवा वाद सुरू झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य ज्या पद्धतीचं आहे त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला होता आणि त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य गाजवणारे एक योद्धे भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. शौर्याचे लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांना शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे. सपकाळांचा नवा इतिहास महाराष्ट्र खपवून घेणार नाही फडणवीस म्हणाले की, टिपू सुलतान आणि छत्रपती शिवरायांच्या तुलनेबद्दल सपकाळांनी माफी मागितली पाहिजे. काँग्रेसच्या मित्रपक्षांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. सपकाळ कोणत्या शाळेत इतिहास शिकले याचंदेखील संशोधन केलं पाहिजे. सपकाळ लिहू पाहत असलेला इतिहास महाराष्ट्र, भारत खपवून घेणार नाही.
नेमके काय म्हणाले नीतेश राणे? मंत्री नीतेश राणेंनी पोस्ट करत म्हटलंय की, टिप्या ची बरोबरी शिवरायांशी करणे यालाच जिहादी मानसिकता बोलतात.. ज्या टिप्याने लाखो हिंदूचे धर्मांतर केले.. मंदिर तोडली.. फक्त इस्लाम वाढवण्यात लक्ष दिले..तो आमच्या शिवरायांच्या जवळ पास पण येऊ शकत नाही ! काँग्रेस प्रदेश अध्यक्षांनी आपल्या कार्यालयात शिवरायांचे फोटो काडून टिप्या चे लाऊन दाखवावे मग बघु शिवरायांचे मावळे त्यांना महाराष्ट्र कसे फिरू देतात ! हर हर महादेव ! असे म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका केली आहे. फडणवीसांनी शहाणपणा शिकवू नये – सपकाळ हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच फडणवीसांनी आम्हाला शहाणपण शिकवण्याच्या भागनडीत पडू नये असा टोलाही हाणला आहे. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे शिवराय आमचा स्वाभिमान आहे आणि टिपू सुलतान पराक्रमी आणि स्वराज्यप्रेमी होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊनच ते इंग्रजाविरोधात लढत होते. ज्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान हे परकीयांशी लढत होते त्यावेळी देवेंद्र फडणवीस ज्या संघ भाजपाच्या विचारातून येतात त्या विचारांचे लोक इंग्रजाची गुलामी आणि हेरगिरी करत होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला इतिहास शिकविण्याच्या भानगडीत पडू नये.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



