digital products downloads

टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे आयोजन अहमदाबादलाच का?: आदित्य ठाकरे यांचा सवाल; आयसीसीने राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला – Mumbai News

टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे आयोजन अहमदाबादलाच का?:  आदित्य ठाकरे यांचा सवाल; आयसीसीने राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला – Mumbai News


आगामी टी-20 विश्वचषक 2026 च्या वेळापत्रकाची घोषणा झाली असून, या स्पर्धेतील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार असल्याची अधिकृत माहिती जाहीर झाली आहे. क्रिकेटप्रेमींसाठी ही आनंदाची बातमी असली तरी, या निर्णयावरून महाराष्ट्रात

.

याआधी 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना देखील अहमदाबादमध्येच खेळवण्यात आला होता. त्यावेळीही अनेकांनी हा निर्णय राजकीय असल्याची टीका केली होती. आता पुन्हा एकदा टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे आयोजन अहमदाबादलाच दिले गेल्याने, क्रिकेटच्या पायाभूत सुविधांबाबत आणि ऐतिहासिक योगदानाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण, मुंबईतील क्रिकेट संस्कृती, ऐतिहासिक मैदानं, विक्रमी सामने आणि प्रेक्षकांची मोठी उपस्थिती हे सर्व गुण मुंबईकडे असतानाही तिला अंतिम सामन्यापासून दूर ठेवले आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावरून आयसीसीला थेट सवाल केला आहे. प्रत्येक मोठा सामना अहमदाबादलाच का? मुंबई, कोलकाता, चेन्नई, मोहाली अशी ऐतिहासिक, पारंपारिक आणि क्रिकेटसाठी ओळखली जाणारी मैदानं असताना अहमदाबादलाच विशेष महत्त्व का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. क्रिकेटचा इतिहास, दंतकथा आणि विक्रमांना साक्षी असलेल्या वानखेडे स्टेडियमला अंतिम सामना देण्यास काय हरकत आहे? असा सवाल त्यांनी केला.

मुंबईलाच कमी महत्त्व दिल्याची भावना

मुंबईत एक उपांत्य सामना मिळाला असला, तरीही तो अंतिम सामन्यासारखा गौरवशाली नसतो. दुसरा उपांत्य सामना कोलकाता किंवा श्रीलंकेतील कोलंबो इथे होणार आहे. त्यामुळे भारतातील क्रिकेटमधील राजधानी मानल्या जाणाऱ्या मुंबईलाच कमी महत्त्व दिल्याची भावना महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. शिवाय, अनेक तज्ज्ञांचे मत आहे की मोठे सामने अशा ठिकाणीच खेळवावेत, जिथे क्रिकेटला परंपरा आहे आणि प्रेक्षकांची उत्स्फूर्त उपस्थिती असते.

पुन्हा एकदा क्रिकेट आणि राजकारणाचा संबंध चर्चेत

आदित्य ठाकरे यांनी पुढे अपेक्षा व्यक्त केली की, आयसीसीने राजकारणापासून दूर राहावे. क्रिकेट हा खेळ आहे आणि तो सत्ताधाऱ्यांच्या निर्णयांवर चालू नये. देशातील सर्व राज्यांना समान संधी मिळाली पाहिजे. विशेषत: ज्या मैदानांनी क्रिकेटला जागतिक मान्यता मिळवून देण्यात भूमिका बजावली आहे, त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. त्यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा क्रिकेट आणि राजकारणाचा संबंध चर्चेत आला आहे. आता आयसीसी या टीकेवर काय प्रतिक्रिया देणार आणि अंतिम आयोजनाबाबत काही बदल केला जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp