digital products downloads

ठाकरेंची शिवसेना परत फुटणार, भाजपाचा हल्लाबोल! ठाकरेंची सेना म्हणाली, ‘भाजपला मदत…’

ठाकरेंची शिवसेना परत फुटणार, भाजपाचा हल्लाबोल! ठाकरेंची सेना म्हणाली, ‘भाजपला मदत…’

Waqf Board Amendment Bill: लोकसभेमध्ये वक्फ सुधारणा विधेयक 12 तासांच्या चर्चेनंतर मंजूर झालं आहे. बुधवारी दुपारी 12 वाजल्यापासून अगदी मध्यरात्रीपर्यंत संसदेत झालेल्या चर्चेनंतर रात्री अडीचच्या सुमारास बहुमताच्या जोरावर हे विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. या विधेयकामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेनं विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी पक्षाची बाजू संसदेतील चर्चेदरम्यान मांडले. मात्र आता ठाकरेंच्या शिवसेनेनं वफ्फविरोधात भूमिका न घेतल्याने राज्यातील मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. बावनकुळेंनी ठाकरेंची शिवसेना परत फुटणार असल्याचं विधान केलं असून त्याला ठाकरेंच्या शिवसेनेनंही उत्तर दिलं आहे.

“वक्फचे समर्थन करणे म्हणजे…”

“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार उद्धव यांनी सोडले आहेत. त्यांनी काँग्रेसचे विचार स्वीकारलेत. त्यांनी विधेयकाला विरोध करुन मतांचे लांगुलचालन केलं असून मुंबई महापालिकेसाठी त्यांनी हे केलं आहे,” असा टोला बावनकुळेंनी ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेल्या विरोधाच्या मुद्द्यावरुन लगावला. एवढ्यावरच न थांबता बावनकुळेंनी, “उबठाचे लोक पक्ष सोडण्याच्या मानसिकतेत आहेत, अनेकांनी संपर्क केला आहे,” असं सूचक विधान केलं आहे. तसेच बावनकुळेंनी, “वक्फचे समर्थन करणे म्हणजे महाराष्ट्र आणि देशाचा अपमान आहे. जनता त्यांना (उद्धव ठाकरेंना) माफ करणार नाही. लोकांना वाटेल त्यांना मतदान करून चूक झाली, पुन्हा जनता त्यांना निवडून देणार नाही,” असंही म्हटलं आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचं उत्तर

बावनकुळेंनी ठाकरेंच्या पक्षात पुन्हा फूट पडणार असल्याचं विधान केल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी त्यांना उत्तर दिलं आहे. “पक्ष प्रवेश वेगळी भूमिका आणि वक्फ वेगळी भूमिका आहे, त्यात मागे पुढे काही नाही,” असं दानवे म्हणाले आहेत. “भाजपला मदत केली म्हणजे हिंदुत्व का आणि विरोध केला तर हिंदू नाही का आणि कुणी प्रवेश करत असेल तर करू द्या,” असं दानवेंनी म्हटलं आहे.

वक्फबाबतची भूमिका दानवेंनी केली स्पष्ट

वफ्फसंदर्भातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या भूमिकेबद्दल बोलताना दानवेंनी, “वक्फबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. भाजपने देशात हिंदू मुस्लिम वाद निर्माण केला. विधयेक मुस्लिम समाजासाठी आहे असं ते सांगतात मात्र विधयेकाआडून वफ्फची जमीन घेण्याची सरकारची च्छा आहे. अरविंद सावंत गेले म्हणजे काय झालं इतरांनी ऐकलं. भाजपने सांगितलं का हे विधयेक हिंदूंसाठी आहे.  मुस्लिमांना विरोध करणे म्हणजे हिंदुत्व नाही,” असं म्हटलं आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp