
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टीका केलीय. उद्धव ठाकरे विकासाच्या मुद्द्यावर बोलले नाहीत. त्यामुळे माझे एक हजार वाचले असा खोचक टोला त्यांनी लगावलाय. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. यानंतर संजय राऊतांनी देखील
एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर दिलंय.
उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातून राज्य सरकारसह केंद्रावर सरकारवर हल्लाबोल केलाय.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी थेट प्रहार केला होता. मात्र, यानंतर देवेंद्र फडणवीसांनीही ठाकरेंना खोचक टोला लगावलाय.. उद्धव ठाकरेंनी माझे एक हजार रूपये वाचवले असं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. भाषणात विकासाच्या मुद्द्यावर ब्र शब्द न काढल्यामुळे एक हजारांची पैज जिंकल्याचं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं.
दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर एकनाथ शिंदेंनी भाषण करत उद्धव ठाकरेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. ठाकरेंनी पक्षातील लोक संपवले असा थेट आरोप एकनाथ शिंदेंनी केला.. दरम्यान त्यांच्या या आरोपांनंतर संजय राऊतांनी
देखील प्रत्युत्तर दिलंय.
मागील काही दिवसात राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतक-यांचं मोठं नुकसान झालंय.. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांनी बांधावर जात शेतक-यांना धीर दिलाय.. शेतक-यांना तात्काळ मदत करावी असं आवाहन ठाकरेंनी सरकारला केलं होतं. दरम्यान यानंतर शिंदे आणि ठाकरेंच्या
शिवसेनेमध्ये वार-पलटवार पाहायला मिळालाय.
उद्धव ठाकरेंनी नेहमीप्रमाणे दसरा मेळाव्याच्या भाषणातून टीकेचे बाण सोडलेत. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून सरकारला धारेवर धरलं. मात्र, ठाकरेंच्या भाषणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील खोचक टोला लगावलाय. तर एकनाथ शिंदेंच्या टीकेवर राऊतांकडून पलटवार करण्यात आलाय.
FAQ
प्रश्न: उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात कोणत्या मुद्द्यांवर टीका केली?
उत्तर: उद्धव ठाकरेंनी २ ऑक्टोबर २०२५ रोजी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात सत्ताधारी भाजप, एकनाथ शिंदे गट, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांनी शिंदे सरकारमधील भ्रष्टाचार, मंत्र्यांच्या नावाने दाऊ परवाने आणि डान्सबार, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदताचा अभाव, महागाई आणि केंद्र-राज्य सरकारांच्या धोरणांवर टीकास्त्र सोडले. तसेच, शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याचे आवाहन केले.
प्रश्न: देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर कोणता खोचक टोला लगावला?
उत्तर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “उद्धव ठाकरेंनी विकासाच्या मुद्द्यावर एकही शब्द न काढल्यामुळे माझे एक हजार रुपये वाचले.” हे विधान त्यांनी ठाकरेंच्या भाषणात विकासाच्या अभावावरून उपहासात्मकपणे केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
प्रश्न: एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांच्यातील आरोप-प्रत्यारोप काय होते?
उत्तर: एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर “पक्षातील लोक संपवले” असा थेट आरोप केला. यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत शिंदे गटावर टीका केली की, “कुठल्या गोधडीत मुतत होता? गांडूळ” असे म्हणत शिंदे, भाजप, मोदी आणि शहा यांच्यावर हल्लाबोल केला. राऊत म्हणाले की, शिवसेना गुढीपाडवा किंवा दसरा मुहूर्त पाहून स्थापन झाली नाही, आणि शिंदे गटाचे मेळावे जनतेच्या लक्षात नसतात.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.