
राज्यात शरद पवार व अजित पवार यांच्या भेटीगाठी वाढल्यात. त्यातच राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य युतीची चर्चाही महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच रंगली आहे. या प्रकरणी राजकीय वर्तुळात वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र
.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एनडीटीव्ही मराठी’ वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखीत त्यांना ठाकरे बंधू व पवार काका-पुतण्याच्या पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतेविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना त्यांनी उपरोक्त दावा केला. माझी पहिली भूमिका ही आहे की, कोणतेही कुटुंब एक होत असेल, तर आम्हाला त्याची कोणतीही अडचण नाही. त्यांनी जरूर एकत्रित यावे. आम्ही त्यांच्या एकत्र येण्याचे स्वागतच करू.
दुसरी गोष्ट म्हणजे, माध्यमे फार जास्त ऐकतात. फार जास्त विचार करतात आणि त्यानंतर त्याचे फार जास्त संदर्भ काढतात. तुम्ही दोन वाक्यांमधील अर्थ काढण्याचे जे काम करता तो फार पुढचा विचार असतो. पण मी याविषयी स्पष्टपणे सांगतो. जे काही सुरू आहे, त्याविषयी मला सध्या तरी रिअलाईमेंटची कोणतीही परिस्थिती दिसत नाही. अर्थात साद आणि प्रतिसाद ज्यांनी दिला, असे तुम्ही म्हणत आहात, ते या याविषयी अधिक सांगू शकतील. मी त्यावर अधिक बोलमे योग्य ठरणार नाही. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तुम्ही जे अर्थ काढता ते कधीच होत नाही. 2019 पासूनचा एवढा तरी अनुभव लक्षात घ्या, असेही ते यावेळी चिमटा काढत म्हणाले.
राज ठाकरे यांच्या टाळीला उद्धव ठाकरे यांचा प्रतिसाद
उल्लेखनीय बाब म्हणजे राज ठाकरे यांनी शनिवारी (19 एप्रिल) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्याचे संकेत दिले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही लागलीच त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. पण यासाठी त्यांनी राज यांना महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो कुणी येईल, त्याचे स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलावणार नाही, मी त्याच्या घरी जाणार नाही हे ठरवण्याचा सल्ला दिला. या दोघांच्या या विधानानंतर मनसे व ठाकरे गट एकत्र येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
शरद – अजित पवारांच्या भेटीगाठी वाढल्या
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्याही गत काही दिवसांत भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे हे दोन्ही नेतेही आपसातील वाद मिटवून जुळवून घेत असल्याचा दावा केला आहे. विशेषतः 15 दिवसांत चारवेळा हे नेते एकमेकांना भेटल्यामुळे या चर्चेने चांगलाच जोर धरला आहे. पण आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या तरी ठाकरे व पवार कुटुंब एकत्र येण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे पुढे काय होणार? याविषयी उत्सुकता वाढली आहे.
हे ही वाचा…
कुणाल कामराला हायकोर्टाचा मोठा दिलासा:अंतिम सुनावणीपर्यंत अटकेपासून अभय; चेन्नईला जाऊन जबाब नोंदवा, पोलिसांना आदेश
मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मोठा दिलासा आहे. न्यायालयाने कुणाल कामराने त्याच्यावरील गुन्हा रद्द करण्यासंबंधी दाखल केलेली याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेतली आहे. तसेच ही याचिका प्रलंबित असेपर्यंत त्याला अटक न करण्याचेही आदेश दिलेत. कोर्टाच्या या आदेशामुळे कुणाल कामराला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्यावर मोठा दिलासा मिळाला आहे. वाचा सविस्तर
बदलापूर एन्काऊंटर प्रकरण SIT ला वर्ग का केले नाही?:हायकोर्टाचा सवाल; महाराष्ट्र पोलिसांवर अवमाननेची कारवाई करण्याचा इशारा
मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी बदलापूर एन्काऊंटर प्रकरण विशेष तपास पथकाला (SIT) अद्याप का वर्ग केले नाही? असा संतप्त सवाल करत महाराष्ट्र पोलिसांना या प्रकरणी अवमाननेची कारवाई करण्याचा इशारा दिला. कोर्टाच्या या भूमिकेमुळे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या तपास यंत्रणांत मोठी खळबळ माजली आहे. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.