
राज्यात सध्या मराठी भाषेच्या अस्मितेवरुन ठिकठिकाणी संघर्ष होताना पाहायला मिळत आहे. शिवसेना आणि मनसेने हा मुद्दा उचलल्यानंतर राज्यात काही ठिकाणी हिंसात्मक घटना घडल्या असून, वाद आणखी पेटला आहे. यादरम्यान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंना खोचक सल्ला दिला दिला आहे. मराठी भाषेच्या नावाखाली राज ठाकरेंनी दादागिरी करू नये. दादागिरी करायचीच असेल तर मनसैनिकांना सैन्यात पाठवावं असं रामदास आठवले म्हणाले आहेत. सांगलीच्या वाळवा येथील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते
“मराठी ही आपली भाषा आहे, पण एखाद्याला मराठी येत नसेल तर त्याला मराठी बोलण्याबाबत सक्ती करू नये. देशाच्या अनेक राज्यात मराठी बांधव राहतात, त्यामुळे राज ठाकरेंनी मराठी भाषेच्या नावाखाली कोणावरही दादागिरी करू नये आणि दादागिरी करायची असेल तर त्यांच्या मनसैनिकांना लष्करात पाठवावं,” असा खोचक सल्ला रामदास आठवलेंनी राज ठाकरेंना लगावला आहे.
उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीसंदर्भात राज ठाकरेंचं भाष्य
मराठी भाषेच्या अस्मितेच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर आता ते भविष्यातील निवडणुकीसाठी राजकीय युती जाहीर करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. उद्धव ठाकरे यांनी वरळीमधील मेळाव्यात एकत्र राहण्यासाठी आलो आहोत असं सांगत भविष्यातील युतीचे संकेत दिले होते. पण त्यानंतर दोन्ही ठाकरेंनी कोणतंही अधिकृत भाष्य केलेलं नाही. दरम्यान मनसेचं तीन दिवसीय शिबीर सुरु झालं असून यामध्ये राज ठाकरेंनी युतीवर भाष्य केलं आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना कामाला लागा, बाकी निर्णय वेळेवर घेऊ असा आदेश दिला आहे. मनसेच्या दुसऱ्या दिवसाच्या शिबिराचे सकाळचे सत्र संपलं आहे. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली.राज ठाकरेंनी यादरम्यान निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.
राज ठाकरेंनी शिबीरात मतदार याद्यावर काम करण्याच्या, मतदार यादीतील दुबार नावे शोधण्याचाही आदेश दिला आहे. तसंच युतीसंदर्भात योग्य वेळी निर्णय घेऊ, तो पर्यत निवडणुकीच्या कामाला लागा असं सांगितलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.