
जिल्हाभरात सर्वदूर झालेल्या पावसामुळे धरण प्रकल्पांमधून नदीपात्रात विसर्ग वाढवण्यात आला. अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील धरणे ओव्हर फ्लो होऊन यंदा ९७००० दशलक्ष घनफूट (९७ टिएमसी) पाणी नदीपात्राद्वारे जायकवाडीत पोहोचले. तीन वर्षानंतर इतक्या मोठ्या प्रम
.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेला रिमझीम पाऊस व मे महिन्यातील लाभ क्षेत्रात झालेला अवकाळी पाऊस यामुळे जिल्हाभरातील लहान मोठी १२ धरण प्रकल्प अपवाद वगळता १०० टक्के भरली. आता परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. धरणांमध्ये पाणलोटातून नवीन पाण्याची आवक सुरू असल्याने, धरणाला धोका उद्भवू नये, यासाठी आवश्यकतेनुसार विसर्ग सोडला जात आहे. २४ तासांत मुळा धरणातील विसर्ग ५०० क्युसेकवरून तब्बल ७ हजार क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला आहे.
नाशिकच्या धरणांमधून गोदावरी नदीत कमालपूर बंधाऱ्याद्वारे ७३.५ टिएमसी, मुळा व प्रवरा नदीतून (नेवासेजवळ मधमेश्वरबंधारा) आतापर्यंत २३.५ टिएमसी पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावले. २०२२ मध्ये यापेक्षा जास्त विसर्ग सोडला होता. तर आतापर्यंत नाशिकमधून सर्वाधिक १८५ टिएमसी पाणी १९६९ मध्ये सोडले होते. सद्यस्थितीत जायकवाडी धरणात मुळा-प्रवरा व गोदावरी नदीतून सुरू असलेली आवक पाहता, जायकवाडीतून विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत जायकवाडी धरणातून सांडव्याद्वारे १८ दरवाजातून २८ हजार २९६ क्युसेक विसर्ग सुरू आहे.
रब्बी हंगमाची चिंता मिटली जिल्ह्यात सुमारे ५.५३ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाची पेरणी होती. यंदा संपूर्ण पावसाळ्यात ओढे नाले ओसंडून वाहिले नव्हते. परंतू, २४ तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढे नाले तुडूंब भरले असून, रब्बी हंगामाची चिंता मिटल्याचे सांगितले जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.