
Sanjay Raut Slams Eknath Shinde Dasara Melava 2025: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर दसरा मेळाव्याच्या मंचावरुन केलेल्या टीकेला ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंची देण्याची दानत नाही म्हणणाऱ्या शिंदेंना ठाकरेंनी काय काय दिलं याची यादीच राऊतांनी ऐकवली आहे. एवढ्यावरच न थांबता सभेतील भाषणात केलेल्या अनेक विधानांवरुन त्यांनी शिंदेंवर टीका करताना थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा उल्लेख केलाय.
चौकशी होईल
“एकनाथ शिंदे म्हणजे बॅरिस्टर राम मनोहर नाहीत किंवा बॅरिस्टर नाथपई नाहीत. एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्या बेईनामी कंपनीचे इकडले ब्युरो चिफ आहेत. मूळ कंपनी जी आहे अमित शहा यांची त्या बेनामी कंपनीचे शिवसेना नावाने कंपनी काढलेली ती बोगस आहे. उद्या जेव्हा सरकार जाईल त्या बेईनामी आम्ही कंपनीचे तेव्हा ही सगळी चौकशी होईल,” असा इशारा राऊत यांनी दिला आहे.
आधी स्वतःला आरशात उभे राहून पाहा
“मी काही त्यांचं भाषण पाहत नाही. ऐकत नाही. कोणाचा ऐकायचं? महाराष्ट्राला महान वक्ते किंवा नेत्यांची भाषण ऐकायचे परंपरा नक्कीच आहे. मराठी माणूस शिवसेनेमुळे हद्दपार झाला. ठाकरे यामुळे हद्दपार झाला अशाप्रकारे एखाद्याने वक्तव्य केलं असेल तर त्याने आधी स्वतःला आरशात उभे राहून पाहायला पाहिजे. शिवसेनेमुळे म्हणजे तुमच्या बरोबर जे आमदार आहेत पळून गेलेले त्यांची किंमत 50-50, 100 कोटी झाली. सुरतला कोण पळून गेलं? मुंबईतून गुवहाटीला कोण पळून गेलं? हे पळणं कुठे आहेत काहीही बोलायचं उचलली जीभ लावली टाळ्याला लिहून दिलेली भाषणे वाचायची,” असं म्हणत राऊतांनी शिंदेंवर टीका केली.
हिम्मत एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे का?
“मुंबईला ठाण्यातला आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस आजही एका श्रद्धाने निष्ठेने बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाबरोबर आहे. मुंबईतला मराठी माणूस हद्दपार करण्याचा विडा जो अमित शहा यांनी उचलला आहे आणि मुंबईत गौतम अडाणी सारख्या उद्योगपतींना विकण्याचा चंग अमित शहा आणि त्याच्या लोकांनी बांधलेला आहे. त्या अमित शहांच्या कंपनीचे एकनाथ शिंदे हे जोडे पुसे आहेत. शब्द मी खूप काळजीपूर्वक वापरत आहे, जोडे पुसे! अमित शहा यांनी ज्या प्रकारचा राजकारण मुंबईत सुरू केलं मराठी माणसाचा तोडायचा त्याचा निषेध करण्याची हिम्मत एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आहे का? नसेल तर त्यांनी मराठी माणसाविषयी बोलू नये,” असा टोला राऊतांनी लगावला.
शिंदेंची काळ्याकुट्ट अक्षरात नोंद होईल
“मराठी माणसाला भ्रष्टाचाराच्या पैशातून विकत घेण्याचे उद्योग त्यांनी चालवले आहे. त्यांच्या इतिहासात नोंद होईल काळ्याकुट्ट अक्षरात नोंद होईल मुंबई मराठी माणसापासून सोडण्याचा जे कारस्थान अमित शहा यांनी जे सुरू केलं त्यांच्या हातामध्ये कुऱ्हाड देण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं,” असंही राऊत म्हणाले.
मग ते कटप्रमुख कसे?
“एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरे यांनी नेता केलं केवळ आमच्या आग्रहाने केलं. यांना बाळासाहेब ठाकरे यांनी नेता केलं नव्हतं. बाळासाहेब ठाकरे यांनी नेते केले जे मोजके लोक आहेत त्यातला मी आहे. बाकी सगळ्यांना उद्धव साहेबांनी मोठ्या दिलाने दयावान बुद्धीने या सगळ्यांना नेता केलं. तुमच्या हातामध्ये एवढी सत्ता दिली तुम्हाला नगरविकास मंत्री केला राज्याचा, मग ते कटप्रमुख कसे?” असा सवाल राऊतांनी एकनाथ शिंदेंना केला आहे.
पाच लाख कोटीचा मालक
“तुमच्यासारखा एक रिक्षावाला आज पाच लाख कोटींचा मालक झाला. एका वेळेला 50 -50 कोटी रुपये उधळतो निवडणुकीवर, 100 कोटी उधळतो… हे उद्धव ठाकरे यांच्यामुळे शक्य आहे. तुम्हाला तुम्ही कोण होता त्याने आत्मचिंतन केलं पाहिजे. धर्मवीर आनंद दिघे मेमोरियल आहे तिथे त्यांनी बसावं शांतपणे. दिवसभर बसावं, आत्मा चिंतन करावं. मी काय होतो आणि मी कोणामुळे असा आहे या पदावर? याचा विचार करावा,” असा सल्ला राऊतांनी दिला आहे.
मोदी मागे पडतील
“उद्धव ठाकरे यांच्यामध्ये दान होती म्हणून रिक्षावाले मंत्री झाले, आमदार झाले हे! दानत होती म्हणून त्यांचा कधीही प्रॅक्टिस न केलेला मुलगा खासदार झाला, हाडवैद्य! दोनदा सर्टिफिकेट बघा त्यांची, मोदी मागे पडतील! उद्धव ठाकरे यांच्या नियतीमुळे शक्य झालं हे. मात्र आता हे सगळे जे लोक आहेत शिंदे गटाचे ते अमित शाहांचं पाद्यपूजन करतात त्याच्यामुळे त्यांच्या मेंदूवर परिणाम झाला आहे,” असा टोला राऊतांनी लगावला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.