digital products downloads

तुळजापूरात निवडणुकीपूर्वी 6 हजार बोगस मतदान: गुन्हा दाखल करूनही पोलिसांकडून कारवाई नाही, ओमराजे निंबाळकरांचा गंभीर आरोप – Dharashiv News

तुळजापूरात निवडणुकीपूर्वी 6 हजार बोगस मतदान:  गुन्हा दाखल करूनही पोलिसांकडून कारवाई नाही, ओमराजे निंबाळकरांचा गंभीर आरोप – Dharashiv News


धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर विधानसभा मतदारसंघात बोगस मतदार नोंदणी प्रकरणावरून मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर केंद्रीय निवडणूक आयोग अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून, त्यांनी या प्रकरणाचा सविस्तर अहवाल म

.

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या आरोपानुसार, या बोगस मतदार नोंदणीत नावे नोंदवले गेलेले अनेक मतदार तुळजापूरचे नसून, मुंबईतील तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजशी संबंधित आहेत, जे तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्याशी संबंधित आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. सध्या निवडणूक आयोगाकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून, आगामी काळात यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

गुन्हा दाखल होऊनही पोलिसांकडून तपास नाही

विधानसभा निवडणुकीपूर्वी चावडी वाचना दरम्यान 6 हजार बोगस मतदार नोंदणी अर्ज आढळले होते. निवडणूक विभागाने विधानसभा निवडणुकीपूर्वीच ऑनलाइन नोंदणी केलेले अर्ज बाद करण्यात आले होते. निवडणूक अधिकाऱ्यांकडून नऊ महिन्यांपूर्वी त्याबाबत तुळजापूर पोलिसांत तक्रार देण्यात आली. बोगस मतदार नोंदणी प्रयत्नात गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी कुठलाही तपास केला नसल्याचा आरोप ओमराजे निंबाळकर यांनी केला होता.

वाढलेल्या बोगस मतांमध्ये तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी

ओमराजे निंबाळकर म्हणाले, एका गावात बोगस मतांची नोंदणी झाल्याचे आमच्या एका पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आल्याने त्याने तक्रार केली होती. त्या तक्रारीनंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी गावोगावी चावडी वाचन केल्यावर 6 हजार बोगस मतदार वाढल्याचे लक्षात आले. 9 महिने आधी निवडणूक आयोगाने तक्रार करून देखील अद्याप पर्यंत कारवाई झाली नाही, यात शून्य तपास आहे. या वाढलेल्या बोगस मतांमध्ये तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज आणि बाकीही काही कॉलेजचे विद्यार्थी आहेत.

राहुल गांधींकडे कागदपत्रे देणार

तसेच राहुल गांधी करत असलेले आरोप बरोबर आहेत. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात असे प्रकार झाले आहेत. निवडणूक आयोग म्हणते, वेळेत का तक्रार केली नाही. यात तर वेळेत तक्रार केली, तेही तत्कालीन निवडणूक अधिकारी यांनीच. पण कारवाई का केली नाही? असा सवालही निंबाळकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच मी आज राहुल गांधी यांना माझं ट्विट टॅग केले आहे, त्यांच्याकडेही कागदपत्र देणार आहे. देशाच्या निवडणूक आयुक्तांकडे मी तक्रार केली आहे आणि कारवाईची मागणी केलीय. पण, कारवाई कशी होईल? पाठीशी कोण आहे हे सगळ्यांना माहीत आहे, असे निंबाळकर म्हणाले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp