digital products downloads

दहीवडा आणि गुलाबजाममुळे 34 वऱ्हाड्यांना विषबाधा: भिवापूर येथील लग्न सोहळ्यातील घटना, 11 जणांना नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये हलवले – Nagpur News

दहीवडा आणि गुलाबजाममुळे 34 वऱ्हाड्यांना विषबाधा:  भिवापूर येथील लग्न सोहळ्यातील घटना, 11 जणांना नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये हलवले – Nagpur News


जिल्ह्यातील भिवापूर शहरातील जिचकार सभागृहात गुरुवार १२ रोजी तिलक वाघमारे यांच्या मुलीचा विवाह सोहळ्यात सुमारे ३४ वऱ्हाड्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडल्याने खळबळ माजली आहे. लग्नानंतरच्या भोजनानंतर वऱ्हाड्यांपैकी अनेकांची रात्री ३ नंतर प्रकृती बिघडल

.

जेवणात दिलेल्या दहीवडा आणि गुलाबजामूनमुळे विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. लग्नातील जेवणानंतर रात्री ३ वाजताच्या सुमारास उलट्या, मळमळ, पोटदुखी व अशक्तपणाच्या तक्रारी सुरू झाल्या. शुक्रवारी सकाळपासूनच विषबाधेचे रुग्ण ग्रामीण रुग्णालय येथे दाखल होण्यास सुरुवात झाली. पाहता पाहता लग्नात उपस्थितांपैकी ३४ लोकांना लग्नातील जेवणामधून विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यातील ११ जणांना नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले आहे. उर्वरित रुग्णांवर ग्रामीण रुग्णालय, भिवापूर येथे उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. इमानदार, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. मनीषा लोंढे आणि प्रा. आ. केंद्र, सोमनाळाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. केवळ कोरडे तसेच डॉ. वाय. बी. बोडखे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली. जेवणाचे नमुने संकलित करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. विषबाधेचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp