digital products downloads

दागिने उजळून देण्याच्या बहाण्याने फसवणूक: 500 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने झाले 250 ग्रॅमचे, वृद्ध महिलेची गोरेगाव पोलिसांत धाव – Hingoli News

दागिने उजळून देण्याच्या बहाण्याने फसवणूक:  500 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने झाले 250 ग्रॅमचे, वृद्ध महिलेची गोरेगाव पोलिसांत धाव – Hingoli News


सेनगाव तालुक्यातील कडोळी येथे एका वृद्ध महिलेची दागिने उजळून देण्याच्या बहाण्याने फसवणुक झाल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी त्या महिलेने शनिवारी ता. २६ गोरेगाव पोलिसांकडे धाव घेऊन रितसर तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनीही त्या दोन भामट्यांचा शोध सुरु

.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील कडोळी येथे दोन भामटे शुक्रवारी ता. २५ दुपारी गावात आले होते. यावेळी त्या भामट्यांनी गावातील एका जेष्ठ महिला वच्छलाबाई कांबळे यांच्या घरी जाऊन दागिने उजळून देत असल्याचे सांगितले. त्यानुसार त्यांनी त्यांना चांदीचे कडे व कोपरे उजळून देण्यासाठी दिले. त्यानंतर भामट्यांनी चांदीचे दागिने उजळून दाखविले अन काही वेळानंतर ते भामटे पळून गेले.

मात्र दागिन्यांचे वजन कमी भरत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार सांगितला. त्यावरून त्यांनी दागिन्यांचे वजन केले असता ते दागिने पाचशे ग्राम वजनाचे असतांना उजळल्यानंतर त्याचे वजन अडीचशे ग्रामच भरले. त्यामुळे आपली फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांच्या कुटुंबाने शनिवारी ता. २६ गोरेगाव पोलिस ठाणे गाठून अर्ज दाखल केला.

दरम्यान, सहाय्यक पोलिस निरीक्षक झळके, उपनिरीक्षक नितेश लेनगुळे, जमादार अनिल भारती, राहुल मैंदकर यांच्या पथकाने गावात जाऊन पाहणी केली. यावेळी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यात दोन भामटे दिसून आले. पोलिसांनी त्यांचे फुटेज घेतले आहे. या सोबतच गोरेगाव पोलिस ठाण्यांतर्गत सर्व गावांमधील पोलिस पाटील यांना याबाबत सुचना दिली असून गावात दागिने उजळून देणारे भामटे आल्यास तातडीने पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन गोरेगाव पोलिसांनी केले आहे.

हे ही वाचा…

शक्तिपीठ महामार्ग रद्द करा, नाहीतर आत्महत्यांना मुख्यमंत्री जबाबदार ठरतील:हिंगोलीच्या गिरगावच्या शेतकऱ्यांचा थेट इशारा

वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांचा शक्तिपीठ महामार्गासाठी विरोध कायम असून गिरगाव येथील शेतकऱ्यांनी शुक्रवारी ता. 25 मोजणी करू दिली नाही. यावेळी शेतकऱ्यांना आत्महत्या केल्यास त्याला मुख्यमंत्री जबाबदार राहतील असा फलक हाती घेऊन शक्तिपीठ महामार्गच रद्द करावा अशी मागणी केली. सविस्तर वाचा…

हिंगोली जिल्ह्यात सर्वदूर पाऊस:भंडारी जवळील नाल्याच्या पुरामुळे पाच गावांचा संपर्क तुटला, ३० जुलैपर्यंत पावसाचा अंदाज

हिंगोली जिल्ह्यात मागील २४ तासापासून सर्वदूर पाऊस सुरु असून सेनगाव तालुक्यात झालेल्या पावसामुळे भंडारी गावाजवळील नाल्याला पुर आला आहे. या पुरामुळे पाच गावांचा संपर्क तुटला असून शालेय विद्यार्थीनी सुमारे चार तास अडकून पडल्या होत्या. शनिवारी ता. २६ दिवसभर हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरुच असल्याने सुर्यदर्शन झालेच नाही. सविस्तर वाचा…

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial