digital products downloads

‘दादा कुठे गेले?’ चिमुकल्या आयेझाचा निरागस प्रश्नान: मुश्रीफांची नात ढसाढसा रडली, अजित पवारांच्या निधनाने मुश्रीफ कुटुंबियांना अश्रू अनावर – Kolhapur News

‘दादा कुठे गेले?’ चिमुकल्या आयेझाचा निरागस प्रश्नान:  मुश्रीफांची नात ढसाढसा रडली, अजित पवारांच्या निधनाने मुश्रीफ कुटुंबियांना अश्रू अनावर – Kolhapur News



राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील विमान अपघातातील निधनाने अवघा महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना झालेल्या या भीषण अपघाताच्या बातमीने राजकीय वर्तुळासह सर्वसामान्यांमध्येही मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. एक कणखर आणि कार्यक्षम नेतृत्व अशा प्रकारे आकस्मिकपणे एक्झिट घेईल, अशी कल्पनाही कुणी केली नव्हती. या घटनेमुळे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर मोठी शोककळा पसरली असून, प्रत्येक नागरिक जड अंतःकरणाने या लाडक्या लोकनेत्याला श्रद्धांजली वाहत आहे. या दुःखद घटनेचे भावनिक पडसाद एका हृदयद्रावक व्हिडिओमधून समोर आले आहेत, ज्यात मंत्री हसन मुश्रीफ यांची नात आयेझा मुश्रीफ ही ढसाढसा रडताना दिसत आहे. टीव्हीवर बातमी पाहताना आईने ‘अजित दादा गेले’ असे सांगताच चिमुकल्या आयेझाला आपले अश्रू अनावर झाले. ‘दादा कुठे गेले?’ असा निरागस प्रश्न विचारत ती मोठमोठ्याने रडू लागली. या प्रसंगासोबतच अजित पवारांचा आयेझासोबत संवाद साधतानाचा एक जुना व्हिडिओही समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे, ज्यातून दादांचे लहानांपासून थोरांपर्यंत असलेले जिव्हाळ्याचे आणि कौटुंबिक नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. बुधवारी सकाळी 8:10 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ‘लिअरजेट 45 एक्सआर’ हे विमान मुंबईहून बारामतीकडे झेपावले होते. मात्र बारामती धावपट्टीच्या अगदी जवळ पोहोचले असतानाच नियतीने घात केला. सकाळी 8:40 च्या सुमारास विमानात अचानक तांत्रिक बिघाड निर्माण झाला आणि वैमानिकाने दोनवेळा सुरक्षित लँडिंगचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु अखेर 8:46 मिनिटांनी विमानावरील नियंत्रण सुटल्याने ते धावपट्टी शेजारील शेतात कोसळले. या भीषण आणि अत्यंत दुर्दैवी अपघातात अजित पवारांसह विमानात असलेल्या सर्व पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला, ज्यामुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, अजित पवारांच्या निधनामुळे संपूर्ण बारामतीमध्ये सध्या शुकशुकाट असून काटेवाडी गावात कुठल्याच घरात चूल पेटली नसल्याचे समोर आले आहे. तसेच काटेवाडी या गावात एक लग्न समारंभ होणार होता, तो देखील रद्द करण्यात आला आहे. अजित पवारांना बारामती भागातून मानणारा एक मोठा वर्ग आहे. हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी अजित पवारांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp