
दिल्लीकरांवरील ‘आप’चे संकट दूर झाले असल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस पक्षाला मतदारांनी चारी मुंडा चीट केले असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. इतकच नाही तर या विजया बद्दल त्यांन
.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे अभिनंदन केले आहे. या माध्यमातून खोटेपणा हरला आणि खरेपणाला मतदारांनी भरभर साथ दिली असल्याचा दावा देखील एकनाथ शिंदे यांनी केला आहे. आता आपला देश आर्थिक महासत्ता होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. यावर मतदारांनी पूर्ण विश्वास व्यक्त केला असल्याचे देखील एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांनी केलेली पोस्ट देखील पहा…..
यह मोदीजी की गॅरंटी का कमाल है |
महाराष्ट्रा पाठोपाठ दिल्लीमधील मतदारांनीही पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाची आणि एनडीएची विजयी घौडदौड सुरूच आहे. त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
दिल्लीकरांवरचे गेली १० वर्षे असलेलं ‘आप’चे संकट या निमित्ताने दूर झाले आहे. दिल्लीच्या विकासावर आलेली ही ‘आपदा’ टळली. त्याचबरोबर, संविधान, मतदान सगळे संकटात असल्याचा खोटा दावा करणाऱ्या काँग्रेस पक्षाला मतदारांनी पुन्हा एकदा चारी मुंड्या चित केलं आहे. खोटेपणा हरला आणि खरेपणाला मतदारांनी भरभरून साथ दिली, त्याबद्दल दिल्लीकर मतदारांना मनापासून धन्यवाद!
घरोघरी लक्ष्मीची पावले उमटावीत म्हणून मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारने सादर केलेल्या यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पावरही मतदारांनी पसंतीची मोहोर उमटवली आहे. आपला देश आर्थिक महासत्ता होण्यापासून आता कोणी रोखू शकत नाही, यावरही मतदारांनी पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.