digital products downloads

दिल्लीत भाजपचा विजय ही EVM ची जादू: ईव्हीएम हैं तो मुमकिन हैं हा भाजपचा नारा झाला; NCP च्या शरद पवार गटाच्या नेत्याचा दावा – Mumbai News

दिल्लीत भाजपचा विजय ही EVM ची जादू:  ईव्हीएम हैं तो मुमकिन हैं हा भाजपचा नारा झाला; NCP च्या शरद पवार गटाच्या नेत्याचा दावा – Mumbai News


दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा झालेला विजय हा ईव्हीएम अर्थात मतदान यंत्राची जादू असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते महबूब शेख यांनी केला आहे. महाराष्ट्रात कुणालाही विचारले तर तो सांगेल की, ही ईव्हीएमची जादू आहे. माझ्या मि

.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पार्टीचा दारुण पराभव झाला. तर भाजपला तब्बल 27 वर्षांनंतर सत्तेची सूत्रे मिळाली. या पार्श्वभूमीवर महबूब शेख यांनी वरील आरोप केला आहे. ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, माझ्या मित्राने मला सांगितले होते की, भाजप 42 च्या पुढे राहील. महाराष्ट्राची निवडणूक आपण पाहिली. मी स्वतः निवडणूक लढवली. त्यामुळे दिल्लीत भाजपच्या 70 पैकी 70 जागा निवडून आल्या असल्या तरी मला आश्चर्य वाटले नसते. ईव्हीएम हैं तो मुमकिन हैं असा भाजपचा नारा झाला आहे. दिल्लीत महाराष्ट्राचीच पुनरावृत्ती झाली आहे.

4 महिन्यांत महायुतीने काय कर्तृत्व दाखवले?

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा असतानाही महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या. ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकरांची निवडून आलेली जागा पराभूत दाखवली. शशिकांत शिंदे यांची जागा पिपाणीमुळे गेली. इचलकरंजी, बुलढाणा, पालगर व अकोला येथे तिरंगी लढत झाली. थेट फाईट झाली असती तर महाराष्ट्रातील लोकांनी 37 जागांवर यांना नाकारले असते. पण त्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी 4 महिन्यांत असे काय कर्तृत्व केले की विरोधी पक्ष 50 च्या आत गुंडाळला गेला आणि हे 237 वर पोहोचले. ही ईव्हीएमची जादू असल्याचे महाराष्ट्रातील कोणताही व्यक्ती सांगेन.

दिल्लीची निवडणूक काँग्रेस व आम आदमी पार्टीने एकत्र लढवली असली तरी त्यांचा पराभव झाला असता. कारण, ईव्हीएम भाजपसोबत आहे. अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या माणसाचा पराभव होतो. एवढे चांगले काम करूनही हा माणूस पडतो. यावरून भाजप ईव्हीएमच्या जोरावर आपण काहीही करू शकतो हे दाखवून देत आहे, असेही महबूब शेख यावेळी बोलताना म्हणाले.

हे ही वाचा…

अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटला:खोटी आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल करण्याच्या परंपरेचा आज अंत झाला -CM देवेंद्र फडणवीस

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या झालेल्या विजयावर आनंद व्यक्त केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयामु्ळे अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटला असून, खोटी आश्वासने देऊन लोकांची दिशाभूल करण्याच्या परंपरेचा आज अंत झाला आहे, असे ते म्हणालेत. वाचा सविस्तर

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp