
महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स…
.
नाशिकच्या सिटी सेंटर मॉल चौकातील सिग्नलवर रिक्षा-बसचा अपघात
नाशिकच्या सिटी सेंटर मॉल चौकात सिग्नलवर रिक्षा आणि बसचा अपघात भीषण अपघात झाला आहे. हा सर्व अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. रिक्षातील 2 जण जखमी झाल्याची माहिती आहे. सिग्नल बंद असल्याने अपघात घडला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
दहशतवाद्यांनी धर्म विचारल्याच्या वृत्ताची पुष्टी नाही- देशमुख
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर एक विधान केले आहे. ते म्हणाले की, ‘पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दहशतवाद्यांनी बळींना गोळ्या घालण्यापूर्वी त्यांचा धर्म विचारला होता की नाही याची कोणतीही ठोस माहिती नाही.’
ते म्हणाले की, हे सत्य केवळ तपासातूनच उघड होऊ शकते. ही एक अतिशय दुर्दैवी घटना आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या नरसंहाराविरुद्ध सरकार कठोर कारवाई करत आहे. सिंधू करार रद्द करण्यात आला आहे. सरकारने खूप चांगले पाऊल उचलले आहे. सविस्तर वाचा
पहलगाम हल्ल्यापूर्वीच अतिरेक्यांशी वाद?
काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये फिरायला गेलो होतो तेव्हा खेचर चालकाने तुम्ही कुराण वाचता का? कोणत्या धर्माला जास्त मानतात असे आम्हाला विचारले. पोलिसांनी जे रेखाचित्र जारी केले ते आणि आमचा वाद झालेल्या खेचर चालकामध्ये साम्य असल्याचा दावा मॉडेल एकता तिवारीहिने केला आहे.
एकता तिवारी पुढे बोलताना म्हणाल्या की, 13 एप्रिलला काश्मीरमध्ये आमचा ग्रुप फिरायला गेला होता. आम्ही काश्मीरमध्ये वेगवेगळ्या भागात फिरत होतो. 20 एप्रिलला आम्ही पहलगामला पोहोचलो. माझ्या भावाच्या गळ्यात असलेली रुद्राक्षाची माळ पाहून त्याने वाद घातला. सविस्तर वाचा
शरद पवारांच्या पक्षांमध्ये पुन्हा भाकरी फिरणार का?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमध्ये पुन्हा एकदा भाकरी फिरणार का? अशी शक्यता वर्तवली जात आहे. पक्षाच्या वतीने सर्व प्रवक्ता या पदावरील नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या संदर्भातले आदेश दिले आहेत. मात्र, अचानकपणे सर्व प्रवक्त्याच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्यामुळे याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सविस्तर वाचा
सर्व पक्षीय बैठकीला ठाकरे गटाची दांडी का?- सावंत
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम मध्ये झालेला दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारच्या वतीने नवी दिल्ली येथे देशातील सर्व पक्षीय बैठक आयोजन करण्यात आली होती. या बैठकीला विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या सह देशभरातील सर्व पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र, उद्धव ठाकरे गटाचा एकही नेता या बैठकीला उपस्थित राहिला नाही.
यामुळे अनेक तर्क वितर्क लावले जात होते. मात्र या बैठकीला का उपस्थित राहिलो नाही? याबाबत उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार अरविंद सावंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. सविस्तर वाचा
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरांकडून अजित पवारांच्या कामाचे कौतुक
उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या वक्तशीरपणा आणि सकाळीच कामाला सुरुवात करण्याच्या सवयीमुळे ओळखले जातात. त्याचप्रमाणे अजित पवार यांनी आज आरोग्य विभागाच्या कार्यक्रमाला सकाळी आठ वाजताच हजेरी लावली. यावर अजित पवार हे आमच्या परीक्षा घेतात आणि आमची अडचण होते, असे म्हणत आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दादांच्या कामाचे कौतुक केले आहे.सविस्तर वाचा
सेन्सेक्स 300 अंकांनी वाढून 80,100 वर
आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंग दिवस, शेअर बाजार आज तेजीत आहे. सेन्सेक्स सुमारे ३०० अंकांनी वाढून ८०,१०० च्या पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टी देखील १०० अंकांनी वर आहे, तो २४,३५० च्या पातळीवर व्यवहार करत आहे.
सेन्सेक्सच्या ३० पैकी १८ शेअर्समध्ये वाढ झाली आहे. टीसीएस, इन्फोसिस आणि एचसीएल टेकचे शेअर्स १% ने वाढले. अॅक्सिस बँकेचे शेअर्स ३% घसरले. नेस्ले इंडियाचा शेअरही १.३% घसरला. सविस्तर वाचा
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.