
देवेंद्र फडणवीस यांना राज्य करण्याची पद्धत येत नाही. त्यांनी आधी राज्य करायला शिकावे. प्रशासन चालवायला शिकावे, प्रशासन म्हणजे सुडाचे राजकारण नाही. आधी फडणवीस यांनी ते शिकावे. देवेंद्र फडणवीस यांना प्रशासन चालवण्यासाठी ट्रेनिंग घेण्याची गरज आहे. त्यां
.
देवेंद्र फडणवीस यांनी वर्तमान काळाबद्दल बोलावे. तुम्ही भूतकाळ कशाला उकरून काढता? भविष्यावर बोला, अशा शब्दात संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पीएम केअर सारखा फंड तयार करण्यात आला होता. त्यातील एक रुपया देखील खर्च करता आला असून त्यात 600 कोटी रुपये पडून असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावरुन राऊत यांनी पलटवार केला आहे.
या वेळी राऊत म्हणाले की, शेतकरी बोलायला उभा राहिला, तेव्हा तुम्ही त्यांचे तोंड बंद करता. हक्काची मागणी करणे हे राजकारण आहे का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्तीचा प्रश्न विचारत आहेत. हे राजकारण आहे का? असा प्रश्नही राऊत यांनी विचारला. भ्रष्टाचार मुक्तीच्या गोष्टी करणाऱ्या फडणवीस यांच्या आजूबाजूला सर्व भ्रष्टाचारी बसले आहेत. त्या भ्रष्टाचाऱ्यांचे खिसे झटकले तरी किमान 50 हजार कोटी रुपये कॅबिनेट मधूनच खाली पडतील, अशा शब्दात संजय राऊत यांनी सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला आहे.
आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.