
धामणगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, तूर आणि कापूस या पिकांसोबतच संत्री, मोसंबी आणि भाजीपाल्याचेही नुकसान झाले आहे.
.
पावसामुळे नाले आणि बंधारे फुटले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्या आहेत. जमिनी खरडून गेल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेतली आणि त्यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी केली.
शेतकऱ्यांनी तत्काळ नुकसान भरपाईची मागणी केली आहे. फळबागांसाठी हेक्टरी १ लाख रुपयांची मदत मागितली आहे. विरुळ रोंघे ते अंजनसिंगी शिवारापर्यंत विदर्भ नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरणाची मागणी केली आहे. चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे हजार हेक्टर शेती खराब झाली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.
या वेळी तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी पंकज वानखडे, विठ्ठलराव सपाटे, मुकेश राठी यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.