
Pahalgam Terror Attack: काश्मिरच्या पहलगाममध्ये मंगळवारी हृदय पिळवून टाकणारी घटना घडली. या घटनेनं संपूर्ण देश हादरलाय.. काश्मीरच्या पहलगाममध्ये फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करत त्यांच्या जीव घेतला. धर्म विचारत दहशतवाद्यांनी गोळी घातल्याच्या मुद्द्यावरुन आता चांगलंच राजकारण पेटलंय. असे असताना अभिनेते अभिजित बिचुकले यांनी यासंदर्भात महत्वाचे विधान केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर द्याव असं मत अभिजीत बिचकुले यांनी व्यक्त केलंय. पंतप्रधानांच्या परवानगीने मीच दहशतवाद्यांना गोळ्या घालेल असेही ते म्हणाले. काय म्हणाले बिचुकले? सविस्तर जाणून घेऊया.
आपण सर्वप्रथम भारतीय होतो आहोत आणि राहू. आपल्या भारतीयांवर जो हल्ला झाला त्याला इट का जवाब पत्थरने असेच उत्तर द्यायला हवे. दहशतवाद्यांना जात धर्म नसतो. कुठल्याही देशातले दहशतवादी असोत, ते **** असतात, असे बिचुकले म्हणाले.
मागे एकदा पुण्यात पाकिस्तान जिंदाबादचा नारा देण्यात आला होता. त्यावेळी त्यांना उचला आणि पाकिस्तानात नेऊन ठेवा, हे बोलणारा मी एकटा होतो. आमचे जाती, धर्म एक असले तरी आम्ही सर्व भारतीय आहोत. भारतीय आमची संस्कृती आहे. पाकिस्त्यांन्यांनी माझ्या देशावर डोळा ठेवू नये. पाकिस्तान्याचे कोणतेही गालबोट मी लागू देणार नाही. कारण मी छत्रपती शिवरायांचा वैचारिक वारसा संभाळतो,असेही ते पुढे म्हणाले.
या माझ्याशी लढा. पंतप्रधान नरेंद्र मोदींची परवानगी घेऊन मीच हातात बंदूक घेतो. तुमचा शिरच्छेद करतो, छातीत गोळ्या घालतो, असे आव्हान त्यांनी यावेळी दहशतवाद्यांना दिले.
राजकारण तापलं
भ्याड हल्ल्याचं कोणतंही राजकारण करु नये असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलंय. तसंच मोदी आणि शाह दहशतवाद्यांना धडा शिकवणार असल्याचा दावा देखील एकनाथ शिंदेंनी केलाय. तर शाह शिंदेच्या पक्षाचे प्रमुख असून त्यांनी शाहांचा राजीनामा मागवा असं आव्हान राऊतांनी शिंदेंना केलंय. राज ठाकरेंनी देखील पहलगाममधील हल्ल्याचा निषेध करत दहशतवाद्यांना धडा शिकवण्याचं आव्हान केलंय.पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मनसे तीव्र निषेध व्यक्त करत आहे. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना मनसेकडून भावपूर्ण श्रद्धांजली. ही घटना अतिशय गंभीर आहे. या प्रसंगात सरकारच्या पाठिशी मनसे पूर्णपणे उभी राहील. केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या 10 पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा. केंद्र सरकार इस्रायल सरकारच्या पाऊलावर पाऊल टाकून या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या मागच्या एकूण एक पाठीराख्याना कायमचं संपवेल अशी अपेक्षा.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.