
मनश्री पाठक (प्रतिनिधी) मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे नवरात्रोत्सवानंतर कोकण दौ-यावर जाणार आहेत. या दौ-यात राज ठाकरे रत्नागिरीत मनसेच्या नव्या चेह-याची घोषणा करतील. वैभव खेडेकर यांच्या हकालपट्टीनंतर रत्नागिरीतील मनसेचा नवा चेहरा कोण याची उत्सुकता लागली आहे.
कोकणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची धुरा गेल्या अनेक वर्षांपासून वैभव खेडेकर यांच्यावर होती. राज ठाकरेंनी वैभव खेडेकरांना कोकणात नेतृत्व दिलं. शिवाय वेळोवेळी त्यांना निवडणुका लढण्याची संधीही दिली. पण गेल्या काही दिवसांपासून वैभव खेडेकर मनसेत अस्वस्थ होते. पक्षाच्याही हे लक्षात आलं होतं. त्यामुळंच वैभव खेडेकर यांनी मनसेला रामराम करण्याआधीच राज ठाकरेंनी वैभव खेडेकर यांची हकालपट्टी केली. आता वैभव खेडेकर यांच्यानंतर मनसेचा कोकणातला चेहरा कोण अशी चर्चा रंगली होती. राज ठाकरेंनी शिवतीर्थवर कोकणातल्या पदाधिका-यांची बैठक घेतली. या बैठकीत कोकणातल्या मनसेच्या रणनितीवर चर्चा झाली. वैभव खेडेकर जरी मनसेतून गेले असले तरी त्यानं पक्षसंघटनेवर कोणताही फरक पडला नसल्याची ग्वाही यावेळी देण्यात आली.
राज ठाकरेंनी कोकणातल्या पदाधिका-यांशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. शिवाय मनसैनिकांचं म्हणणंही ऐकून घेतलं. आगामी जिल्हा परिषद, नगर परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची तयारी म्हणून बुथलेव्हलवर काम करण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिलेत. नवरात्रोत्सवानंतर कोकणात राज ठाकरे दौरा करणार असल्याचंही मनसेकडून सांगण्यात आलं.
हेही वाचा : कर्जतच्या जंगलात सापडला नौदल जवानाचा मृतदेह; नेमकं घडलं काय? गूढ कायम
वैभव खेडेकर यांच्या मनसेतून हकालपट्टीमुळं पक्षसंघटनेवर कोणताही परिणाम झाला नाही यासाठी मनसेनं आतापासूनच तटबंदी करण्यास सुरुवात केलीय. वैभव खेडेकरांनी मनसेच्या हालचालींवर मौन बाळगलंय. भाजप प्रवेशानंतरच ते यावर बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. राज ठाकरे आता मनसेचा कोकणातला कॅप्टन कोण निवडणार याकडं सर्व मनसैनिकांचं लक्ष लागलंय.
FAQ :
राज ठाकरे कधी कोकण दौऱ्यावर जाणार आहेत?
राज ठाकरे नवरात्रोत्सवानंतर कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते रत्नागिरीत मनसेच्या नव्या चेहऱ्याची घोषणा करतील.
वैभव खेडेकर यांची मनसेत भूमिका काय होती?
वैभव खेडेकर हे कोकणातील मनसेचे प्रमुख संघटक आणि राज्य सरचिटणीस होते. गेल्या अनेक वर्षांपासून कोकणात मनसेची धुरा त्यांच्यावर होती. राज ठाकरेंनी त्यांना नेतृत्व आणि निवडणुका लढवण्याची संधी दिली होती.
राज ठाकरेंनी कोकण पदाधिकाऱ्यांची बैठक कधी आणि कुठे घेतली?
राज ठाकरेंनी शिवतीर्थवर कोकणातील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत कोकणातील रणनीतीवर चर्चा झाली आणि वैभव खेडेकर यांच्या जाण्यानंतरही पक्षसंघटनेवर फरक पडणार नाही अशी ग्वाही देण्यात आली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.