
नागपूरमध्ये रात्री उसळलेल्या दंगलीनंतर आज तिथे परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मंगळवारी केला. पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री 12.30 ते दीड च्या सुमारास परिस्थिती नियंत्रणात आणली. तेथील काही भागांत खबरदारी म्हणू
.
नागपुरात सोमवारी रात्री औरंगजेबाच्या मुद्यावरून दोन समुदायांत भीषण दंगल झाली. त्यात पोलिसांसह अनेकजण जखमी झाले. समाजकंटकांनी जाळपोळही केली. या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी वरील माहिती दिली आहे. ते मंगळवारी सकाळी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, नागपूरमध्ये सोमवारी रात्री हिंसाचार झाला. त्यानंतर पोलिसांनी मध्यरात्री 12.30 ते 1.30 च्या सुमारास परिस्थिती नियंत्रणात आणली. नागपूरच्या काही झोनमध्ये कलम 144 (संचारबंदी) लावण्यात आले आहे. काही ठिकाणी गाड्यांचे, दुकानांचे व घरांचे नुकसान झाले आहे.
दोषींवर कडक कारवाई होणार
समाजकंटक काही घरांमध्येही शिरल्याची माहिती आहे. अशा गंभीर प्रकरणांत कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहेत. सरकारने भाजप आमदार प्रवीण दटके यांनी केलेल्या दाव्यांची दखल घेतली आहे. त्यांच्या मते रात्री 10 च्या सुमारास नागरिकांनी स्थानिक पोलिस निरीक्षकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात होता. पण तो झाला नाही. हा संपर्क का झाला नाही त्याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पण या घटनेची चौकशी केली जाईल. दोषींवर कडक कारवाई केली जाईल.
दंगलीचे दुपारनंतर प्लॅनिंग झाल्याचा अंदाज
ते पुढे म्हणाले, सोमवारी सकाळी नागपूरमध्ये एक आंदोलन झाले होते. त्यात कोणताही वाद झाला नव्हता. दुपारी काही जण पोलिस ठाण्यात जमा झाले होते. त्यांचे पोलिस आयुक्तांशी बोलणेही झाले होते. वाद तेव्हाच मिटला होता. पण त्यानंतर सायंकाळी 4-5 वाजता या हिंसाचाराचे प्लॅनिंग झाले असावे असा अंदाज आहे. पण याविषयी काहीही खात्रीशीरपणए सांगता येणार नाही. या प्रकरणी घर व गाड्यांवर हल्ले करण्यात आले. याचे कुठे व कुणी प्लॅनिंग केले याची चौकशी केली जाईल.
नागपूरमधील हिंसाचाराचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पण या प्रकरणी 47 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रस्तुत घटनेत 2 ते 3 सर्वसामान्य नागरिकांसह 12 -14 पोलिस कर्मचारी जखमी झालेत. पोलिस या घटनेचे मूळ शोधून काढतील, असेही मंत्री योगेश कदम यावेळी बोलताना म्हणाले.
हे ही वाचा…
नागपूर हिंसाचार – औरंगजेबाच्या कबरीवर वादानंतर 11 भागात संचारबंदी:रात्री उशिरा दोन समाजात दगडफेक-जाळपोळ, घरे, वाहने फोडली; DCP वर कुऱ्हाडीचा हल्ला
नागपूर – औरंगजेब कबरीच्या वादावरून सोमवारी रात्री 8:30 वाजता नागपूरच्या महाल परिसरात हिंसाचार उसळला. विश्व हिंदू परिषदेने (VHP) मुघल सम्राट औरंगजेबाचा पुतळा जाळला आणि त्याची कबर पाडण्याची मागणी केली. यानंतर दगडफेक आणि तोडफोड सुरू झाली. दंगलखोरांनी घरांवर दगडफेक केली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या वाहनांना आग लावली. पोलिसांवरही हल्ला झाला. कुऱ्हाडीच्या हल्ल्यात डीसीपी निकेतन कदम जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आणि 55 हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.