
ग्रामीण जीवनात महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा सोमवारी प्रारंभ झाला. भातकुली येथील पंचायत समिती कार्यालयातून या अभियानाची सुरुवात झाली असून, या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या विविध लोकोपयोगी योजनांची
.
आमदार राजेश वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी युवा स्वाभिमान पार्टीचे सुनील राणा, डीआरडीएच्या प्रकल्प संचालक प्रीती देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस, भातकुलीचे बीडीओ तुषार दांडगे, सहायक गटविकास अधिकारी सुनील गवई आणि प्रवीण वानखेडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, रोजगार सेवक, सीएससी केंद्रांचे संचालक तसेच स्वयंसहायता गटाचे पदाधिकारी व सदस्य यांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्यामार्फत शासकीय योजनांची माहिती सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा यामागील मुख्य उद्देश होता.
या अभियानांतर्गत जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या रथाला हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला. नाविन्यपूर्ण उपक्रमाचा भाग म्हणून, या जनजागृती रथासोबत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नोडल अधिकाऱ्यांच्या सहभागाने कलापथक मार्गदर्शन करणार आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भातकुलीचे बीडीओ तुषार दांडगे यांनी केले, तर कृषी अधिकारी पवनकुमार ढोमणे यांनी सूत्रसंचालन केले. अभियानाचे नोडल अधिकारी प्रल्हाद तेलंग यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी विस्तार अधिकारी निलेश भुयार, कृषी अधिकारी प्रवीण हरणे यांच्यासह पंचायत समितीचे इतर कर्मचारीही उपस्थित होते.
यावेळी उपस्थित असलेल्यांनी कलापथकाच्या सादरीकरणाचे कौतुक केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत नियुक्त नोडल अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या कलापथकाने दिलेला अर्थपूर्ण संदेश खूप प्रभावी वाटला, अशा प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केल्या. या कलापथकांमुळे गावागावात अभियानाची खरी जनजागृती होईल आणि कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



