digital products downloads

नाना पटोले सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर; काँग्रेसमध्ये चर्चांना उधाण: माजी प्रदेशाध्यक्ष भाजपमध्ये परतणार असल्याच्या अटकळांना बळ – Nagpur News

नाना पटोले सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर; काँग्रेसमध्ये चर्चांना उधाण:  माजी प्रदेशाध्यक्ष भाजपमध्ये परतणार असल्याच्या अटकळांना बळ – Nagpur News


माजी प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस नेते नाना पटोले सध्या सार्वजनिक जीवनातून अलिप्त आहेत. एकेकाळी सातत्याने टीव्हीवर दिसणारे आणि बातम्यांमध्ये राहणारे पटोले गेल्या काही महिन्यांपासून कोणत्याही कार्यक्रमात दिसले नाहीत. अखिल ओबीसी समाजाच्या मेळाव्यापासूनही

.

पटोले पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा तर्क लावला जात आहे. मात्र, भाजपच्या नेत्यांनी या शक्यता नाकारल्या आहेत, तर काँग्रेसचे नेते यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. नाना पटोले यांच्या या बदललेल्या भूमिकेमुळे काँग्रेस नेत्यांनाही प्रश्न पडला आहे.

नाना पटोले यांनी यापूर्वी भाजपचे खासदार म्हणून काम केले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला होता. राहुल गांधी यांनी त्यांना राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होण्यास सांगितले होते आणि किसान महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्षपद दिले होते. त्यांनी गोंदिया-भंडारा मतदारसंघातून प्रफुल्ल पटेल यांचा लोकसभेत पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आव्हान दिले होते, परंतु त्यात त्यांना यश आले नाही.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर ते पुन्हा भंडारा जिल्ह्यात परतले आणि विधानसभेत निवडून आले. महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आल्यानंतर त्यांना विधानसभेचे अध्यक्षपद मिळाले.

मात्र, त्यांच्या बंडखोर वृत्तीमुळे ते अध्यक्षपदाच्या मर्यादित भूमिकेत रमले नाहीत. त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्या बदल्यात काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्षपद मिळवले. राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेमुळे त्यांना आणखी बळ मिळाले आणि राहुल गांधींसोबत त्यांचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले. लोकसभा निवडणुकीत उमेदवार निवडण्याचे अधिकार त्यांच्या हाती होते, ज्यामुळे पक्षात त्यांचे वजन वाढले. काही काँग्रेस नेत्यांच्या मते, त्यांची एकाधिकारशाहीही वाढली होती.

याबाबत अनेक नेत्यांनी दिल्लीत तक्रारी केल्या होत्या. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर या तक्रारींचा फारसा परिणाम झाला नाही. काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणूकही त्यांच्याच नेतृत्वात लढण्याचा निर्णय घेतला होता.

लोकसभा निवडणुकीचा निकाल बघून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल, असेच सर्वांना वाटत होते. असे झाल्यास नाना पटोले मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार होते. हे बघता प्रदेशाध्यक्ष या नात्याने महाविकास आघाडीतील तीन पक्षांसोबत वाटाघाटी, बोलणी आणि जागा वाटपाचा निर्णयात त्यांनी जास्तच हस्तक्षेप केला. १०० जागांवर ते अडून बसले होते. ज्याचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री असे सूत्र ठरले होते. याकरिता पटोले जास्तीत जास्त मिळाव्या यासाठी आग्रही होते. जागा वाटपाच्या मात्र शेवटच्या आघाडीत मोठा असंतोष निर्माण झाला. त्यानंतर राहुल गांधी यांनी सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. नाना पटोले यांना या सर्व प्रक्रियेपासून लांब ठेवण्यात आले. निवडणुकीच्या निकालाने पटोल यांच्यासह महाविकास आघाडीला जबर धक्का बसला. संपूर्ण चित्रच पालटून गेले. आघाडीचा दारुण पराभव झाला. पराभवाचे सर्व खापर काँग्रेसने पटोले यांच्यावर फोडले. त्यांना प्रदेशाध्यक्षपद सोडावे लागले.

विधिमंडळ पक्षाचे नेते होण्याची त्यांची इच्छाही काँग्रेसने पूर्ण केली नाही. त्यानंतर ते हळूहळू दुरावत गेले. आता दिसेनासे झाले आहेत. भाजपात आधीच गर्दी झाली आहे. त्यांना परत भाजपमध्ये घेण्यास अनेकांचा विरोध आहे. या उपरही भाजपात गेल्यास पदाचा प्रश्न आहे. त्यामुळे भाजपात जाऊन ते काय करणार? असा प्रश्न आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्ये असतानाही त्यांच्याकडे कुठलीच जबाबदारी देण्यात आलेली नाही.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp