
मराठी साहित्य विश्वातील क्रांतिकारी कवी तथा दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत सापडला आहे. सेन्सॉर बोर्डाने (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) या चित्रपटाला परवानगी ना
.
‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित आहे. मराठी व हिंदी भाषेतील या 2 तासांच्या चित्रपटाद्वारे 1970 ते 1975 च्या कालखंडातील युवा क्रांती दल व दलित पँथरच्या चळवळीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. या चित्रपटाला जगभरातील 262 फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन मिळाले आहे. त्याला अनेक पुरस्कारही मिळालेत. पण भारतातच सेन्सॉर बोर्डाने त्याला परवानगी नाकारल्यामुळे निर्माते हैरान झाले.
सेन्सॉर बोर्डाला नामदेव ढसाळ कोण हेच माहिती नाही
सेन्सॉर बोर्डाचे अधिकारी रेवणकर व सय्यद रबी हश्मी यांनी निर्मात्यांना पाठवलेल्या एका नोटीसीत नामदेव ढसाळ कोण हेच आम्हाला माहिती नसल्याचा अजब दावा केला आहे. नामदेव ढसाळ कोण आहेत हे आम्हाला माहिती नाही. त्यांच्या कविता चित्रपटातून वगळल्या तर सेन्सॉर बोर्ड चित्रपटाला परवानगी देण्यावर विचार करू शकतो, असे त्यांनी म्हटले. बोर्डाच्या या भूमिकेमुळे चित्रपट निर्माते बुचकळ्यात पडलेत. हा चित्रपटच मुळात नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित असल्यामुळे त्यांच्या कविता कशा वगळणार? असा विचित्र प्रश्न त्यांच्यापुढे उभा टाकला आहे.
नामदेव ढसाळ यांच्याशिवाय हा चित्रपट अपूर्ण आहे. त्यांच्या कविता या चित्रपटाच्या आत्मा आहेत, असे चित्रपट निर्माते महेश बनसोडे या प्रकरणी म्हटले आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यास विलंब होत असल्यामुळे निर्मात्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. त्यामु्ळे त्यांनी या प्रकरणी कायदेशीर लढा देण्याचे संकेत दिलेत. दुसरीकडे, सोशल मीडियावरही या प्रकरणी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकजण या प्रकरणी सेन्सॉर बोर्ड अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करत असल्याचा आरोप करत आहेत. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर नामदेव ढसाळ यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचतील, असे ते म्हणालेत.
आता पाहू कोण होते नामदेव ढसाळ?
नामदेव ढसाळ (15 फेब्रुवारी 1949 – 15 जानेवारी 2014) हे मराठी साहित्यातील एक थोर कवी, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते होते. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पूर गावात जन्मलेल्या ढसाळ यांनी मुंबईच्या गोलपीठा परिसरातील कठोर जीवनातून प्रेरणा घेत ‘गोलपीठा’ (1973) हा पहिला कवितासंग्रह लिहिला. या संग्रहाने साहित्यविश्वात खळबळ माजली. त्यांच्या विद्रोही कवितांनी दलितांचे दुःख आणि व्यवस्थेविरुद्धचा राग प्रभावीपणे मांडला. त्यांनी 1972 मध्ये ज. वि. पवार यांच्यासह ‘दलित पॅंथर’ ही संघटना स्थापन केली, जी जातिव्यवस्थेविरुद्ध लढणारी आक्रमक चळवळ ठरली. ढसाळ यांना 1999 मध्ये पद्मश्री आणि 2004 मध्ये साहित्य अकादमीचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.