
नाशिक महापालिकेचे ७/१२ उताऱ्यावर गेल्या २५ वर्षांपासून नाव असलेल्या आणि वक्फ बाेर्डाने हक्क सांगितलेल्या जागेतील दर्गाची अनधिकृत भिंत पालिकेने शनिवारी पहाटे ४ वाजता कटेकाेट पाेलिस बंदाेबस्तामध्ये हटविली. त्यानंतर जवळपास १२ तास शहरामध्ये तणावाचे वाताव
.
स्थानिक रहिवाशांच्या तक्रारींनंतर हिंदुत्ववादी संघटनेने वादग्रस्त दर्ग्यासमाेर बजरंगबलीचे मंदिर उभारण्याचा इशारा दिला हाेता. याच पार्श्वभूमीवर शनिवारी काठेगल्लीसह जुने नाशिकसह परिसरात तब्बल १५०० पाेलिसांचा बंदाेबस्त तैनात करत पहाटे ४ वाजता मनपाने कारवाईला सुरुवात करण्यात अाली. दरम्यान, पालिकेची ही कारवाई सुरु असतांना काठेगल्ली तसेच पखाल राेड परिसरात दाेन्ही समुदायातील नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. पालिकेच्या वतीने अाता भिंत हटविण्यात अाली असली या दर्ग्याबाबत पुढील कार्यवाहीची दिशा ३ मार्चच्या सुनावणीनंतरच हाेणार आहे.
नाेटीसदेखील दिलेली नाही
ही जागा ही खाजगी दर्गा ट्रस्टची असून वक्फ मध्ये रजिस्टर आहे. वक्फ ट्रायब्युनल कोर्टाचे आदेश असतानाही कारवाई करण्यापूर्वी महापालिकेने सूचना/ नाेटिस दिलेली नाही.
आम्ही हायकाेर्टात जाऊ
खासगी दर्गा ट्रस्टच्या या जागेत हस्तक्षेप न करण्याचेे १३ सप्टेंबर २०२४ चे वक्फ ट्रायब्युनलचे आदेश हाेते. मनपाच्या कारवाईविराेधात आम्ही हायकाेर्टात जाऊ. -तबरेज शेख, अध्यक्ष, ट्रस्ट
वकिलांच्या सल्ल्यानंतरच कारवाई
रहिवाशांच्या तक्रारी व २००९ पासून वाद हाेता. विश्वस्तांसाठी मुदत, वक्फच्या निकालाचा अभ्यास, वकिलांचा सल्ला व जुने नकाशे पाहून कारवाई केली. – स्मिता झगडे, अतिरिक्त आयुक्त
आंदाेलनाची सुरुवात नाशिकपासून
राज्यात वक्फ बाेर्डासंदर्भात महत्वाच्या ३० तर एकूण १४०० वादग्रस्त जागा आहेत. त्या वक्फच्या ताब्यातून साेडवण्याच्या आंदाेलनाची सुरुवात नाशिकपासून झाली. -सुधीरदास पुजारी, महंत
पुढील निर्णयासाठी आणखी ७ दिवस वाट पाहणार
दर्गा असलेल्या जागेवर वक्फ बाेर्डाने दावा केला असून त्याबाबत पालिकेला २०२४ मध्ये नाेटीस प्राप्त झाली आहे. जागेच्या ७-१२ वर नाशिक महानगर पालिकेचेच नाव आहे. १९९८ मध्ये जागा मालकाने करारनामा करत भूखंड पालिकेकडे वर्ग केला हाेता. याबाबतची सुनावणी ३ मार्चला हाेणार आहे. त्यामुळे आम्ही ७ दिवस दिवस वाट पाहणार. – देवयानी फरांदे, आमदार
सिद्धटेक गणेश मंदिराजवळही वक्फचे अतिक्रमण
कर्जत तालुक्यात सिद्धटेक येथील अष्टविनायकपैकी एक असलेल्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराजवळ अनधिकृतपणे दर्गा उभारून हा भाग वक्फ बोर्डाचा असल्याचा दावा करण्यात आला होता. याबाबत अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी स्वतः कार्यकर्त्यांसह सिद्धटेक येथे जाऊन अतिक्रमण जमीनदोस्त केले.
मनपाकडे ७/१२ : भाेगवटादार, मनपा व इतर अधिकारांत दर्गा
पुढे काय : ३ मार्चपर्यंतला सुनावणी हाेईपर्यंत काेणतीही कारवाई हाेणार नाही.
पहाटे ४ : पासून कारवाईची तयारी. ७ वाजता भिंत पाडण्यास सुरुवात. दाेन तासांनी संपूर्ण दर्गाच काढल्याची अफवा. दुपारी ४ : पाेलिस आयुक्तालयात अधिकारी, धार्मिक संघटना आणि राजकीय नेत्यांची बैठक.
१५ जानेवारी २०२५ राेजी ७/१२ उताऱ्यातील शेवटच्या फेरफारानुसार १५ चाैरस मीटरमधील ८.२८ चाै.मी भाेगवटदार, ४.६६ चाै.मी मनपा आणि २.५७ चाै.मी जागा दर्ग्याच्या नावे आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.