
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा वाद काही संपताना दिसून येत नाही. यात आता 1 मे महाराष्ट्र दिनी आदिती तटकरे या रायगडमध्ये झेंडावंदन करणार असल्याने त्यांनाच पालकमंत्रिपद मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे. यावर शिवसेनेचे नेते भरतशेठ गोगावले यांनीही प्रति
.
मंत्री भरतशेठ गोगावले म्हणाले की, झेंडावंदन करता आले म्हणजे पालकमंत्रिपद दिले असे नाही. मागच्या वेळी 15 ऑगस्टला झेंडावंदन दिल्याने यावेळी दिले असेल. वाटतो म्हणून तर चालले आहे, काही गोष्टी वाटूनच चालायच्या असतात. एकट्यानी नसतात घ्यायच्या.
जे होईल ते चांगले होईल
भरतशेठ गोगावले म्हणाले की, पूर्वी त्यांना पालकमंत्रिपद दिले होते त्या अनुषंगाने त्यांना झेंडावंदनाचा अधिकार दिला आहे. त्यांना पालकमंत्रिपद मिळाले असे नाही, तशी शंका आणायचे काही कारण नाही. जे होईल ते चांगले होईल.
रायगड-नाशिकचा वाद संपला?
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मंत्री अदिती तटकरे यांच्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून जिल्ह्याच्या नेतृत्वावरून वाद सुरुच आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हा वाद सोडवण्यासाठी प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. दुसरीकडे नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा ही वाद आहे. तिथे भाजपच्या गिरीश महाजन यांना झेंडावंदन करता येणार आहे. यामुळे तेच नाशिकचे पालकमंत्री होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे महायुतीमधील पालकमंत्रपदाचा वाद इथे संपणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेचे दादा भूसे हे इच्छूक होते. महाराष्ट्र दिनी तरी या दोन्ही नेत्यांच्या हस्ते त्यांचा जिल्ह्यात ध्वजवंदन करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. त्यामुळे महाजन आणि तटकरे यांचेच नाव पुन्हा फायनल झाल्याची माहिती आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.