digital products downloads

निजाम घालवला, तसा त्याच्या नोंदींही घालवू- लक्ष्मण हाके: चौथी नापास आरक्षण शिकवणार का म्हणत मनोज जरांगेंना टोला – Nanded News

निजाम घालवला, तसा त्याच्या नोंदींही घालवू- लक्ष्मण हाके:  चौथी नापास आरक्षण शिकवणार का म्हणत मनोज जरांगेंना टोला – Nanded News


निजामाच्या जुलमी राजवटीला संपवण्यासाठी मराठवाड्यातील जनतेने लढा लढला होता. कालच मुक्तिसंग्राम दिन साजरा केला.याच निजामांच्या नोंदीद्वारे महाराष्ट्रातील ओबीसीचे आरक्षण संपणार आहे. त्या गॅझेट विरोधात ओबीसींचा लढा सुरू झाला आहे. नांदेडमध्ये माध्यमांशी ब

.

लक्ष्मण हाके म्हणाले की, निजामाच्या नोंदी महाराष्ट्रातल्या सामाजिक न्यायाच्या विरोधामध्ये आहेत.ओबीसी, भटके आणि बलुतेदारांचे हक्क आणि अधिकार संपवणारे आहेत हे मराठवाड्यातील जनतेने मनावर घेतले आहे. त्यामुळे जसा निजामांना घालवला तसाच आम्ही आता निजामाच्या नोंदींना घालवणार आहोत, ज्या ओबीसीचे आंदोलन संपवणार आहेत.

जरांगे पाटील इतिहासात जायला भाग पाडू नका

लक्ष्मण हाके म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीला नाही तर अमेरिका आणि अरब देशात जावे. कारण जरांगे पाटील दिल्लीला कधी गेला नव्हता. इतिहासात जायला भाग पाडू नका. नर्मदा नदीच्या तिराच्या पलीकडे मराठी साम्राज्य कोण घेऊन गेले हे आता नव्याने महाराष्ट्राला सांगायची गरज नाही. तुम्ही खरं तर भारताबाहेर जायला हवे होते पण तुम्ही बसलात मागासवर्गीयांच्या अन्नात माती कालवत. मागासवर्गीयांच्या ताटात उदक सोडत बसलात तुम्ही.

चौथी नापास दिल्लीत जाऊन काय करणार?

लक्ष्मण हाके म्हणाले की, पंगतीला बसलेला डोंगराच्या कुशीतला भटका असो किंवा गाव गाड्यातला रोज आपली सेवा देणारा अलुताबलुता असो त्याला शिक्षण आणि नोकर्यांमध्ये थोडसं प्रतिनिधित्व मिळायला लागलं होते आणि त्यांची ताट उधळून लावणारा तू चौथी नापास, दिल्लीमध्ये जाऊन काय करणार? असा सवाल करत त्यांनी जरांगेंचे नाव न घेता टोला लगावला आहे.

देशाच्या लोकसंख्येमध्ये तुमचा टक्का किती?

लक्ष्मण हाके म्हणाले की, देशाच्या लोकसंख्येमध्ये तुमचा टक्का किती आहे, आणि ओबीसींची संख्या किती त्यामुळे मंडल आयोगाला चॅलेंज करेन अमुक करेन तमुक करेन. आरक्षणाचे स्पेलिंग लिहता येते का बघ आगोदर असे म्हणत जरांगे पाटलांना टोला लगावला आहे. त्यानंतर मोठ्या मोठ्या बाता माराव्या. आम्ही गावोगाव फिरत आहोत मग मुंबई कशी जाम करायची याचे आमचे नियोजन ठरले आहे.

आरक्षण टिकवण्यासाठी लक्ष द्या

लक्ष्मण हाके म्हणाले की, बंजारा समाजाच्या मागणीला आमच्या शुभेच्छा आहेत. पण आज रोजी एकीने लढण्याची गरज आहे. बंजारा आणि धनगर समाजाची एसटीच्या आरक्षणाची 4 पिढ्यांची लढाई आहे. आपल्या ताटातील आरक्षण वाचवण्यासाठी आपण ओबीसींची वज्रमूठ बांधून आपले आहे ते आरक्षण टिकवणे याकडे आपले लक्ष असले पाहिजे, अशी माझी ओबीसी आंदोलक म्हणून सर्वांना विनंती आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp