
बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी निवडणूक आयोगावर मतदार यादीतील घोळाबाबत तीव्र संताप व्यक्त करत थेट गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, जर निवडणूक आयोगाला अशा प्रकारे घोळ करून निवडणुका घ्यायच्या असती
.
अलीकडेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदार यादीतील अनियमिततेवर निवडणूक आयोगावर टीका केली होती. त्याच पार्श्वभूमीवर पालघरमधील सुषमा गुप्ता नावाच्या महिलेचे नाव एका मतदार यादीत तब्बल सहा वेळा नोंदवले गेल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकारावरून ठाकूर यांनीही निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल करत व्यवस्थेतील ढिसाळपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
हितेंद्र ठाकूर म्हणाले, अशा प्रकारचे असंख्य घोळ मतदार यादीत आहेत. आम्ही हे प्रकार वेळोवेळी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र त्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. लोकसभा आणि विधानसभेत अशाच प्रकारे परिवर्तन झाले असल्याचा आरोपही त्यांनी केला.
जर निवडणूक आयोगाकडूनच अशी निष्क्रियता राहणार असेल, तर यापुढे कोणत्याही निवडणुका घेण्याची गरज नाही. थेट ग्रामपंचायतीपासून आमदार- खासदारापर्यंतचे उमेदवार आयोगानेच घोषित करावेत. त्यामुळे ग्रामपंचायतचा सदस्य कोण किंवा आमदार कोण हा निवडणुकीचा प्रश्नच राहणार नाही, असेही हितेंद्र ठाकूर म्हणाले.
वसई मतदारसंघातून तीन वेळा विजयी झालेले हितेंद्र ठाकूर यांना यंदा पराभवाचा धक्का बसला. भाजपाच्या स्नेहा दुबे-पंडीत यांनी हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला आहे. निवडणूक यादीतील झालेल्या फेरफारीमुळे हा पराभव झाल्याचा दावा हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.