digital products downloads

पहलगाम भ्याड दहशतवादी हल्ला: संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे यांचे पार्थिव पुण्यात आणलं – Pune News

पहलगाम भ्याड दहशतवादी हल्ला:  संतोष जगदाळे, कौस्तुभ गणबोटे यांचे पार्थिव पुण्यात आणलं – Pune News


जम्मू काश्मीरमील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे भारतामध्ये संतापाची लाट आहे. या हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुण्यातील दोघांचा समावेश आहे. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा पहलगाम दहशतवादी हल्ल्

.

दरम्यान कौस्तुभ गणबोटे यांच्या निवासस्थानीही त्यांच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचलेल्यांना अश्रू अनावर झाले आहेत. पुणे एअरपोर्टवर गुरुवारी पहाटे गणबोटे आणि जगदाळे यांचे पार्थिव नेण्यासाठी रुग्णवाहिका पोहचल्या त्यावेळी मंत्री माधुरी मिसाळ आणि मंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.

महाराष्ट्रातील मृतांची नावे

1) अतुल मोने – डोंबिवली 2) संजय लेले – डोंबिवली 3) हेमंत जोशी- डोंबिवली 4) संतोष जगदाळे- पुणे 5) कौस्तुभ गणबोटे- पुणे 6) दिलीप देसले- पनवेल

हे झाले जखमी

1) एस बालचंद्रू 2) सुबोध पाटील 3) शोबीत पटेल

दाेघांत गेल्या 25 वर्षांपासून मैत्री

पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात पुण्यातील संताेष जगदाळे आणि काैस्तुभ गनबाेटे या दाेघांना त्यांच्या कुटुंबीयांच्या डाेळ्यासमाेर अतिरेक्यांनी गाेळ्या घालून ठार केले. या दाेघांत गेल्या 25 वर्षांपासून मैत्री हाेती आणि फरसाणच्या व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्यात अधिक जवळीक निर्माण झाली हाेती. हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या मैत्रीचा करुण शेवटही एकत्रच झाला. जगदाळेंचे एकुलत्या एक एमबीए झालेल्या उच्चशिक्षित मुलीच्या लग्नाचे, तर गनबाेटे यांचे नातवाचे बारसे करण्याचे स्वप्न अधुरे राहिले असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

ढगफुटीमुळे वैष्णोदेवीऐवजी काश्मीर पर्यटनाला गेले होते

संताेष पत्नी प्रगती व मुलगी आसावरी आणि काैस्तुभ गनबाेटे व त्यांची पत्नी संगीता असे 5 जण शनिवारी रात्रीच्या विमानाने काश्मीरला 10 दिवसांच्या दाैऱ्यावर दिल्लीला गेले हाेते. त्यांचा वैष्णोदेवीला जाण्याचा संकल्प हाेता. परंतु ढगफुटीमुळे त्यांनी काश्मीर खाेऱ्यात फिरावयास जाण्याचा निर्णय घेतला होता. अतिरेक्यांनी जगदाळेंच्या डाेक्यात, पाठीत व मानेला अशा तीन तर गनबाेटेंना पाेटाला व डाेक्याला दाेन गाेळ्या घातल्या. दाेघे मित्र रक्ताच्या थाराेळ्यात पडून राहिले. डाेळ्यादेखत दाेघांवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याने कुटुंबीय भयभीत झाले व मदतीसाठी याचना करत राहिले. परंतु घटनेनंतर बराच वेळ मदत मिळू शकली नाही व भारतीय लष्कर नंतर आल्याने माेठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. रुग्णालयात नेल्यावर त्यांचा काहीच वेळात दुर्दैवी मृत्यू झाल्याचे सांगताना संताेष यांचे भाऊ अजय यांच्या डाेळ्यात अश्रू तरळले.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp