
लैलेश बारगजे (प्रतिनिधी) मुंबई : राज्यात महायुतीचं सरकार आता स्थिरस्थावर झालंय, मात्र तरीही रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा काही सुटत नाहिये. शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पालकमंत्रिपदासाठी अजुनही रस्सीखेच सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौ-यानंतर पालकमंत्रिपदाचा तिढा सुटल्याची चर्चा आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या तिढ्याचं अजुनही भीजत घोंगडं आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या रायगड दौ-यानंतर तिढ्यावर तोडगा निघेल अशी शक्यता होती. मात्र अजूनही अधिकृत कोणतीही घोषणा झाली नाही. सरकार मधील शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष पालकमंत्रिपद सोडायला तयार नाही. त्यामुळे गेल्या चार महिन्यांपासून जिल्ह्याला पालकचं नाहिये. दरम्यान रायगड पालकमंत्री पदाचा तिढा लवकर सुटेल अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली.
हेही वाचा : तुमच्या स्मार्टफोनवर सायबर गुन्हेगारांचा डोळा, मोबाईल चोरून ‘असा’ मारला जातोय बँक खात्यावर डल्ला!
दरम्यान पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला टोला लगावला आहे. रायगडच पालकमंत्री पद आदिती तटकरे यांना जाहीर केलं मात्र महिलेवर कसा अन्याय केला जातो आणि जिल्ह्याला विकासापासून दूर कसे ठेवलं जातं, हे आपण पाहतोय असं पाटलांनी म्हंटलय.
रायगडमध्ये काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सुनिल तटकरेंच्या घरी स्नेहभोजन केलं. आज एकनाथ शिंदे आणि अमित शाहांमध्ये तासभर चर्चा झाली. चर्चेनंतर शिंदेंनी भरत गोगावलेंना तातडीने मुंबईला बोलावून घेतलंय. त्यामुळे पालकमंत्रीपद कुणाच्या वाट्याला जाणार याबाबत शंकाच आहे. पण गेल्या अनेक महिन्यांपासून पालकमंत्रिपदापासून वंचित असलेल्या जिल्ह्याला आतातरी पालकमंत्रि मिळणार का याकडेच लक्ष आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.