digital products downloads

पिंपळदरीत पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला: गावावर शोककळा, तेलंगणातून काम करून परतला होता तरुण – Hingoli News

पिंपळदरीत पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला:  गावावर शोककळा, तेलंगणातून काम करून परतला होता तरुण – Hingoli News


औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथे पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह मंगळवारी ता. 23 सकाळी सापडला. तेलंगणा राज्यातून काम करून तो नुकताच गावी आला होता. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

.

याबाबत गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळदरी येथील नामदेव माधव रिठे (32) हे अल्पभूधारक शेतकरी असून घरी आई, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी ते शेती करून तेलंगणात मका काढण्याच्या मजुरीला जातात. काही दिवसांपूर्वी ते कामासाठी गेले होते. सोमवारी ता. 22 ते गावी पिंपळदरी येथे आले होते.

दरम्यान, सोमवारी दुपार पासून पिंपळदरी परिसरात मोठा पाऊस झाला. या पावसामुळे नदी, नाल्यांना पुर आले होते. गावालगतच्या असलेल्या ओढ्याला पूर आला होता. रात्रीच्या वेळी नामदेव हे ओढ्यातून घराकडे जात होते. यावेळी त्यांना पुराच्या पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले. रात्री उशीरा पर्यंत ते घरी आले नसल्याने ते पुरात वाहून गेले असावे अशी शक्यता लक्षात घेऊन गावकऱ्यांनी त्यांचा शोध सुरु केला होता.

पिंपळदरी येथील सामाजिक कार्यकर्ते बापूराव घोंगडे, बाळु डुमने, साहेबराव नाईक, गंगाधर ढाकरे, विश्‍नाथ रिठे, दत्ता खुडे, ज्ञानेश्‍वर रिठे, नवनाथ रिठे, सुरेश रिठे, कैलास मुकाडे, मोतीराम रिठे यांच्यासह गावकऱ्यांनी सुरु केला शोध आज सकाळी सात वाजता संपला. पुराच्या पाण्यात बेपत्ता झालेल्या नामदेव यांचा मृतदेह गावापासून एक किलो मीटर अंतरावर तलावाच्या बाजूला असलेल्या शेतात आढळून आला. या घटनेची माहिती औंढा नागनाथ पोलिस ठाण्याला तसेच तहसील कार्यालयास माहिती देण्यात आली असून अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान या पुराच्या पाण्यात गावातील गणेश धनवे यांच्या मालकीच्या दोन शेळ्या वाहून गेल्याची माहितीही गावकऱ्यांनी दिली आहे.

ओढ्यावर पुल नसल्याने घडली घटना ः बापूराव घोंगडे, सामाजिक कार्यकर्ते

पिंपळदरी गाव एका बाजूला असून दुसऱ्या बाजूला एक लहान वस्ती आहे. गावातून वस्ती-मध्ये जाण्यासाठी ओढा ओलांडून जावे लागते. या ओढ्यावर पुल नसल्यामुळे गावकऱ्यांना ओढ्यातूनच जावे लागत आहे. पावसाळ्यातही गावकऱ्यांना ओढ्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. या ठिकाणी पुलाचे बांधकाम करणे आवश्‍यक आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp