digital products downloads

पुणे जिल्ह्यातील 48 गावांचा संपर्क तुटला; 2 तास आधीच भोंगा वाजणार आणि…

पुणे जिल्ह्यातील 48 गावांचा संपर्क तुटला; 2 तास आधीच भोंगा वाजणार आणि…

Pune Rain : पुणे जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. सर्वत्र पाणीच पाणी झाले असून येथील जन जीवन विस्कळीत झाले आहे.  पुणे जिल्ह्यातील 48 गावांचा संपर्क तुटला आहे. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक धरणांमधल्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. अशा स्थितीत नैसर्गिक आपत्तीच्या वेळी 2 तास आधीच भोंगा वाजणार आहे. 

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील भीमाशंकर, आहुपे व पाटण खोऱ्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार पावसाने काही झाडे पडल्याने तर काही ठिकाणी दरडी कोसळुन वाहतुक बंद झाली आहे. पाटण ते आहुपे परिसरातील 18 गावांचा संपर्क तुटला आहे. 

कोंढवळ गावच्या रस्त्याला दरड कोसळल्याने त्याभागाचाही संपर्क तुटला आहे. डिंभे ते आहुपे याही परिसरातील 25 गावांचा संपर्क तुटला आहे. तर भातखाचरांचे बाधं तुटले आहेत. जनावरांचा चारा पुर्णता वाया गेला आहे. सर्वत्र पाणी पाणी होऊन भातखाचरांना तळ्याचे स्वरुप आले आहे. त्यामुळे आदिवासी भागातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे

दरम्यान, पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक धरणांमधल्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. मे महिन्यात धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने यंदा धरणं लवकर भरण्याची शक्यता आहे. धरणातून विसर्ग करताना दोन तास अगोदर नागरिकांना सूचना मिळणार आहे. 
धरणातून विसर्ग करण्याचा इशारा यंत्रणा भोंग्याच्या स्वरूपात पाणी शिरण्याचा धोका असलेल्या ठिकाणी कायमस्वरुपी बसवावी. त्याची माहिती पालिकेच्या नियंत्रण कक्षाने नागरिकांना द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
यंदा मान्सून लवकर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

जलसंपदा विभागाकडून पूरस्थितीमध्ये नदीमध्ये धरणातून किती क्युसेक पाण्याचा विसर्ग केल्यानंतर शहरातील कोणकोणत्या भागांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, याची माहिती महापालिकेला देण्यात आली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. पहाटेपासून वादळी वाऱ्यासह मिळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नद्या नाले तुटुंब भरून वाहत आहेत. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेय.

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. पण जिल्ह्यातील बहुतांश नद्यांची पाणी पातळी वाढलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नदीवर असणारे 13 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सतत पाच दिवस पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणी पातळी देखील मोठी वाढ झाली आहे.  

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp