digital products downloads

पुण्यातील TCS च्या ऑफिसमध्ये खळबळजनक घडामोडी; 12000 कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यासाठी कंपनीने वापरला भयानक पर्याय

पुण्यातील TCS च्या ऑफिसमध्ये खळबळजनक घडामोडी; 12000 कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यासाठी कंपनीने वापरला भयानक पर्याय

TCS Layoffs : भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) मध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कर्मचारा कपात सुरु आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांना आकर्षक सेव्हर्नन्स पॅकेजेस दिले आहेत. ज्या कर्मचाऱ्यांचे कौशल्य बदलत्या तंत्रज्ञानाशी आणि कंपनीच्या गरजांशी जुळत नाही, त्यांच्यासाठी कंपनी सहा महिन्यांच्या पगारापासून ते जास्तीत जास्त दोन वर्षांच्या पगारापर्यंतचे सेव्हर्नन्स पॅकेजेस देत आहे. राजीना देण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात आहे.

Add Zee News as a Preferred Source

पुण्यातील TCS ऑफिसमधील  सुमारे 2500 कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट (एनआयटीईएस) ने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात हा आरोप केला आहे . एनआयटीईएसचे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा यांनी या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारकडून त्वरित कारवाई करण्याची विनंती केली आहे.

टीसीएसने पुढील वर्षभरात त्यांच्या कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 2 टक्के किंवा अंदाजे 12,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तांत्रिक बदल आणि ऑटोमेशनच्या युगात कंपनीला अधिक कार्यक्षम आणि भविष्यासाठी सज्ज ठेवण्यासाठी हे पाऊल आवश्यक असल्याचे कंपनीचे मत आहे. अधिक काळ एका प्रोजेक्टवर काम करणारे कर्मचारी.  AI तसेच नवीन टून न शिकणारे, स्वत:ला अपडेट न ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचा नोटिस कालावधी दिला जाईल. यानंतर  सहा महिने ते 24 महिन्यांचे सेव्हरन्स पॅकेज दिले जाईल. हे सेव्हरन्स पॅकेज कर्मचाऱ्याच्या सेवेच्या लांबीवर आधारित असेल. टीसीएसच्या एका सूत्राने सांगितले. या श्रेणीतील सर्वात कमी सेव्हरन्स वेतन सहा महिने आहे.” गेल्या आठ महिन्यांपासून बेंचवर असलेल्या, म्हणजेच त्यांना कोणत्याही प्रकल्पात नियुक्त केलेले नसलेल्या कर्मचाऱ्यांना फक्त तीन महिन्यांचा नोटिस कालावधी वेतन दिले जाईल.

 कौशल्य पुनर्संरचनामुळे प्रभावित कर्मचाऱ्यांना त्यांच्या परिस्थितीनुसार योग्य काळजी आणि पाठिंबा दिला जात आहे,” असे टीसीएसने एका निवेदनात म्हटले आहे. अशा कर्मचाऱ्यांना फक्त 3 महिन्यांच्या पगाराचा मूळ सूचना कालावधीचा वेतन दिला जात आहे. हे असे कर्मचारी आहेत ज्यांना गेल्या 8 महिन्यांपासून कोणताही सक्रिय प्रकल्प मिळालेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या श्रेणीतील कर्मचाऱ्यांना अंदाजे 1.5 वर्षांच्या पगाराएवढा सेव्हरन्स पे दिला जात आहे. हे अशा लोकांसाठी आहे ज्यांचे कौशल्य आता कंपनीच्या गरजांशी जुळत नाही.  अशा वरिष्ठ कर्मचाऱ्यांना 1.5 ते 2 वर्षांच्या पगाराचे सेव्हरन्स पॅकेज मिळू शकते. यापैकी काही निवडक प्रकरणांचा अजूनही कंपनीमध्ये पदासाठी विचार केला जात आहे.

कंपनी निवृत्तीचे वय जवळ असलेल्या कर्मचाऱ्यांना लवकर निवृत्तीचे पर्याय देखील देत आहे. यामुळे विम्यासह संपूर्ण निवृत्ती लाभ आणि त्यांच्या सेवेच्या कालावधीनुसार सहा महिने ते दोन वर्षांच्या पगारापर्यंत अतिरिक्त सेवानिवृत्ती पॅकेज मिळेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुतेक कर्मचाऱ्यांचे समायोजन ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पूर्ण झाले. सध्या फक्त काही निवडक प्रकरणांचे मूल्यांकन केले जात आहे, कर्मचाऱ्यांना नवीन भूमिका शोधण्याचा पर्याय देण्यासाठी कंपनीच्या रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुप (RMG) कडे पाठवले जात आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp