
अंजली दमानिया यांनी नितीन गडकरी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यावर भाजपकडून कोणीच अद्याप प्रतिक्रिया दिली नाही. त्यांचे आरोपही खोडून काढले नाहीत. गडकरी यांनी सुद्धा यावर बोलण्याचे टाळले होते. मात्र सोमवारी आरओबी लोकार्पण कार्यक्रमातील भाषणातून त्
.
शेतकरी इंधनदाता, ऊर्जादाता झाला पाहिजे यासाठी मी प्रयत्न करीत आहे. शेतमालापासून इथेनॉल तयार करण्याचे काम केले जात आहे. माझी इनोव्हा गाडी याच इथेनॉलवर धावते. आज आपल्या देशात मोठ्या प्रमाणात इथेनॉलची निर्मिती होत आहे. याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना फायदा होत आहे. प्रदूषणातही घट झाली आहे. परदेशातून पेट्रोल आणि डिझेल आयातीत घट झाली आहे. आयातीवर यापूर्वी २२ लाख कोटी रुपये आपल्या देशातून परदेशात जात होते. त्यामुळे काही लोकांचा धंदा मारला गेला. या धंद्यातील दलाल अस्वस्थ झाले. त्यांनी माझ्या विरोधात पेड न्यूज सुरू केल्या. मात्र तुम्ही चिंता करू नका. माझ्यावर कितीही आरोप केले तरी मी विचलित होत नाही. तुम्हीसुद्धा काळजी करू नका.
कोण, कोणाच्या सांगण्यावरून आरोप करीत आहे हे जनतेला ठावूक आहे. सर्वांना सत्य काय ते कळते. आपली रेषा मोठी करण्यासाठी काही लोक असे आरोप करीतच असतात. त्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. कुठल्याही राजकीय नेत्यांच्या आयुष्यात हे प्रसंग येत असतात. माझे सर्वात मोठे भांडवल हे जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद आहे. मी ४५ वर्षांपासून राजकारणात आहे. राज्यात असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री होतो. केंद्रात अकरा वर्षांपासून रस्ते व वाहतूकमंत्री आहे. कोट्यवधीचे रस्ते बांधले. विकास कामे केली केली. देशभर रस्त्यांचे आणि पुलांचे जाळे विणले. मात्र कधी खाबूगिरी केली नाही. एक पैसाही कंत्राटदारांकडून घेतला नाही. म्हणूनच कंत्राटदार मला घाबरतात. फळाने लदबदलेल्या झाडालाच सर्वाधिक दगड मारले जातात असे सांगून गडकरी यांनी अंजली दमानिया यांना त्यांचे नाव न घेता सुनावले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.