
Devendra Fadnavis: राजकारणात संयम आणि सकारात्मकता या दोनच गोष्टी मला इथपर्यंत घेऊन आल्या, असे प्रतिपदान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठी पत्रकार संघातर्फे देवेंद्र फडणवीसांचा फिनिक्स पुरस्कारानं गौरव करण्यात आला.. दरम्यान या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या एका विधानाची चांगलीच चर्चा सुरू आहे. पाहुयात काय म्हणालेत देवेंद्र फडणवीस? सविस्तर जाणून घेऊया.
अजित पवारांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना दमदाटी केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर चांगलंच रान पेटलंय. अजित पवारांनी वापरलेल्या भाषेनंतर विरोधकांनी त्यांच्यावर शरसंधान साधलंय. दरम्यान या प्रकरणावर पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाष्य केलंय.. संबंधित प्रकरणावर अजित पवारांनी खुलासा केला असून त्याबाबतचा अहवाल मागावला असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मराठी पत्रकार संघातर्फे फिनिक्स पुरस्कारानं गौरवण्यात आलं. दरम्यान त्यांना मिळालेल्या या पुरस्कावरून संजय राऊतांनी त्यांना टोला लगावलाय. तर राऊतांच्या टीकेवर भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी पलटवार केलाय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानावर खासदार सुप्रिया सुळेंनी देखील भाष्य केलंय. फडणवीसांची राख होईल असं मला कधीच वाटलं नाही, तसंच राजकारणात कोणाचीही राख होत नाही तसंच कोणीही संपत नाही, असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलंय..
देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झालीय. ज्यावेळी राखेचा क्षण आला तेव्हा सकारात्मकतेनं सामोरे गेल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. तसंत त्यांच्या टीकाकारांचा देखील देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात समाचार घेतलाय.
FAQ
प्रश्न: मराठी पत्रकार संघाने दिलेल्या फिनिक्स पुरस्काराबद्दल आणि त्यावरील सुप्रिया सुळे यांच्या विधानाबाबत काय माहिती आहे?
उत्तर: मराठी पत्रकार संघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फिनिक्स पुरस्काराने सन्मानित केले. या पुरस्कार सोहळ्यात फडणवीस यांनी सांगितले की, राजकारणात संयम आणि सकारात्मकतेमुळे ते यशस्वी झाले. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी, “फडणवीसांची राख होईल असे मला कधीच वाटले नाही, राजकारणात कोणाचीही राख होत नाही किंवा कोणीही संपत नाही,” असे सूचक विधान केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.
प्रश्न: अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील वादावर देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली?
उत्तर: सोलापूरच्या माढा तालुक्यात अवैध खडी उपशाच्या कारवाईदरम्यान अजित पवार यांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना फोनवर धमकावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. यावर पहिल्यांदाच भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, अजित पवार यांनी याबाबत खुलासा केला असून, या प्रकरणाचा अहवाल मागवण्यात आला आहे.
प्रश्न: फिनिक्स पुरस्कार सोहळ्यातील फडणवीस यांच्या विधानावर संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्या प्रतिक्रियांमुळे कोणता वाद निर्माण झाला?
उत्तर: फिनिक्स पुरस्कार स्वीकारताना फडणवीस यांनी सांगितले की, राखेच्या क्षणी सकारात्मकतेने सामोरे गेल्याने त्यांना यश मिळाले आणि त्यांनी टीकाकारांचा समाचार घेतला. यावर शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी टोला लगावला, तर भाजपचे नवनाथ बन यांनी राऊतांवर पलटवार केला. सुप्रिया सुळे यांनीही फडणवीस यांच्या विधानावर, “राजकारणात कोणी संपत नाही,” असे म्हणत सूचक प्रतिक्रिया दिली, ज्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.