
काँग्रेस नेते तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशभरातील निवडणूक प्रक्रियेत ‘वोट चोरी’ संदर्भात केलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर एनएसयूआय व युवक काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी शनिवारी येथील बसस्थानकात ‘वोट चोर खुर्ची छोड’
.
युवक काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, जिल्हाध्यक्ष नीलेश गुहे, उपाध्यक्ष नितीन काळे, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष संकेत कुलट आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. एसटी बसवर पोस्टर चिकटवून वोट चोरीचा संदेश जनमानसांत पोहोचवण्यात आला. यासंदर्भात काँग्रेसने देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार युवक काँग्रेस आणि एनएसयूआयने स्थानिक पातळीवर आंदोलन केले.
युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानूजी आणि प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या निर्देशानुसारच्या या आंदोलनात काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारीही सहभागी झाले होते. राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत निवडणूक आयोग आणि भाजपवर गंभीर आरोप केले. महाराष्ट्रात एक कोटी मतदार संशयास्पद पद्धतीने मतदार यादीत समाविष्ट केले आहेत आणि बंगळुरूच्या महादेवपुरा विधानसभा क्षेत्रात एक लाखांहून अधिक खोट्या मतदारांची नोंद आहे. यासह मध्य प्रदेश, हरियाणा आणि बिहारमधील निवडणुकीतही मतदार यादीत अनियमितता आणि ‘वोट चोरी’ झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे युकाँतर्फे निवडणूक आयोगाच्या कथित निष्क्रियतेची आणि भाजपच्या कथित मत चोरीच्या कटाची जनजागृती केली जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.