digital products downloads

बांधकामाची गुणवत्ता तपासणाऱ्या बांधकाम विभागाचे कार्यालय बुडाले पाण्यात

बांधकामाची गुणवत्ता तपासणाऱ्या बांधकाम विभागाचे कार्यालय बुडाले पाण्यात

Maharashtra Rain : गेल्या २४ तासांपासून मुसळधार पावसाने बुलढाणा जिल्ह्याला जलमय’ केलं आहे. पण मलकापूरात तर चक्क जिल्हा परिषदेच्या उपविभागीय बांधकाम कार्यालय जलमय झाले. ज्या विभागावर बांधकामांची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी आहे, तोच विभाग गुडघाभर पाण्यात बुडाला. आता प्रश्न असा आहे, की ज्यांना स्वतःचं कार्यालय वाचवता येत नाही, ते बांधकामांची गुणवत्ता काय तपासणार?

Add Zee News as a Preferred Source

मलकापूर शहरातील या शासकीय कार्यालयात पाणी शिरल्याने महत्त्वाच्या फाईल्स, कागदपत्रं आणि फर्निचर पाण्याच्या लाटेत वाहून जाण्याच्या मार्गावर आहेत. ज्या प्रशासनाने नागरिकांना  सुरक्षित राहा’ असं आवाहन केलं, त्यांचंच कार्यालय पाण्याखाली गेल्याने आता प्रशासनाचीच सुरक्षा प्रश्नचिन्हाखाली आली आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळेवर काम करणं तर सोडाच, आता पाण्याच्या या लाटेमुळे फाईल्स भिजून कामाचा खोळंबा होणार आहे. 

जालना शहर मुसळधार पाऊस

जालना शहरात मुसळधार पाऊस झाल्यानं अनेक भागात पाणी साचलंय. अतिवृष्टी झाल्यानं अनेकांच्या  घरातही पाणी शिरलं. घरगुती संसारोपयोगी साहित्य भिजलं. त्यामुळे नागरीकांची चांगलीच तारांबळ उडालीय. घरातील तसेच रस्त्यावर साचलेलं पाणी बाहेर काढण्यासाठी महापालिका अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर उतरले असून साचलेली घाण साफ करण्याचं काम महापालिका कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी हाती घेतलंय. तर नुकसान झालेल्या भागात आमदार अर्जुन खोतकर यांनीही पाहणी करत पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारपासून जोरदार कमबॅक केल आहे. विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला. चंद्रपूर आणि परभणी जिल्ह्याला तर पावसाने झोडपून काढल आहे.तर आजही राज्यात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.  परभणी जिल्ह्यात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. जिल्ह्यातील नऊ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली असून या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. तूर, मूग, उडीद, सोयाबीन,कापूस पाण्यात गेला आहे. पूर्णा तालुक्यात थुना नदीला पूर आला असून अनेक नावकी गावातील काही घरात पुराचे पाणी शिरले होते. यामुळे नागरिकांनी जीव मुठीत धरून रात्र काढलीय. आता रात्रीपासून पावसाने उघडीप दिल्याने पाणी पातळी कमी होतेय  पण नदीला आलेल्या पुरामुळे सर्व पीक पाण्याखाली गेली आहेत. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp