
हिंगोली जिल्ह्यात अंगणवाडीतील बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून स्व इमारती असलेल्या 982 अंगणवाडी इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करून स्वतंत्र अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी महिला बालकल्याण विभागाला
.
हिंगोली जिल्ह्यात 1072 अंगण वाड्या असून त्यापैकी 982 अंगण वाड्या स्वतःच्या इमारतीमध्ये आहेत. या शिवाय सुमारे 90 अंगणवाड्यांची दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने या अंगण वाड्या ग्रामपंचायत कार्यालय, प्राथमिक शाळा किंवा समाज मंदिरात भरवल्या जात आहेत. जिल्ह्यातील या अंगणवाड्यांमधून सुमारे 25 हजारापेक्षा अधिक बालके पुर्व प्राथमिक अभ्यासक्रमाचे धडे गिरवतात या शिवाय बालकांचे कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी त्यांना पोषण आहाराचे वाटप केले जाते.
दरम्यान, जिल्ह्यातील एका अंगणवाडीच्या छताच्या प्लास्टरचा काही भाग कोसळला होता. सुदैवाने या ठिकाणी बालके नव्हती. त्यानंतर बालकल्याण विभागाने सदर जागेवरील अंगणवाडी बंद करून शाळेच्या इमारतीमध्ये अंगणवाडी भरवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी महिला बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय बोराटे यांच्याकडून जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांची तसेच त्यामध्ये येणारी बालके, त्यांना दिला जाणारा पोषण आहार, गरोदर व स्तनदा मातांना दिला जाणारा आहार याची माहिती घेतली.
यानंतर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये अंगणवाडीच्या इमारतीची स्थिती कशी आहे, इमारतीच्या भिंतींना तडे गेले आहेत काय, इमारतीचे छत गळत आहे का यासह इतर सर्व बाबींचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या अंगण वाड्या दुरुस्तीसाठी किती खर्च लागणार याची माहितीही सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा नियोजन समितीमधून अंगणवाडी दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून घेण्याचे प्रयत्न असल्याचे बालकल्याण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.