
हिंगोली ते कनेरगावनाका मार्गावर बासंबा फाटा शिवारातील एका ढाब्याजवळील पुलावर पिकअप वाहनाचा अपघात होऊन अमरावती जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ता. 13 पहाटे घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन दोघांना शासकिय रुग्
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली ते कनेरगावनाका या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 वर बासंबा शिवारात एका ढाब्याजवळ बुधवारी ता. 13 पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास एकता पिकअप वाहनाचा अपघात झाला असून वाहनातील दोघेही गंभीर असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग पथकाला मिळाली होती. त्यावरून उपनिरीक्षक साईनाथ अनमोड, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शेषराव पोले, सय्यद तय्यबअली, बळीराम शिंदे, विकास गवळी तसेच बासंबा पोलिस ठाण्याचे शेख उमर, गजेंद्र बेडगे, भडंगे, वाळले यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी घटनास्थळी पिकअप वाहनाचा समोरील भागात दोघे जण अडकून पडल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांना तातडीने हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून दोघांचाही मृत्यू झाल्याचे जाहिर केले. पोलिसांनी वाहनातील कागदपत्रे व मयताकडील ओळख पत्रावरून त्यांची नांवे गणेश ठाकरे (25), मोहन ठाकरे (21,रा. महेशपूर, ता. दर्यापूर, जि. अमरावती) अशी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, सदर दोघेही त्यांच्या पिकअप वाहना मध्ये अमरावती येथून घरगुती सामान घेऊन धाराशिव कडे जात होते. त्यांचे वाहन हिंगोली जवळ बासंबा शिवारात आल्यानंतर समोरील वाहनाला धडकल्याने हा अपघात झाला असवा अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक शामकुमार डोंगरे, जमादार राजकुमार जमदाडे, शेख रहीम यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.